• Sun. Sep 22nd, 2024

दुष्काळासाठी हिवरेबाजारचे परफेक्ट नियोजन, १६ कोटी लिटर पाणी राखीव ठेवणार, पाण्याचा ताळेबंद सादर

दुष्काळासाठी हिवरेबाजारचे परफेक्ट नियोजन, १६ कोटी लिटर पाणी राखीव ठेवणार, पाण्याचा ताळेबंद सादर

अहमदनगर : यावर्षीच्या दुष्काळी परिस्थितीची चाहूल लक्षात घेता आदर्श गाव हिवरे बाजारने गावात उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षीची गरज भागवून १६ कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. पाण्याचा वापर कमी व्हावा, यासाठी उन्हाळ्यात फक्त जनावरांचा चारा व फळबाग जगविणे एवढेच उद्दिष्ट ठेवून इतर पिकांसाठी पाण्याचा वापर टाळण्यात येणार आहे. यावर्षी ५३८ मि.मी. पाऊस झाला असून सुमारे ५२५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. तरीही पाणी बचतीचा निर्णय ग्रामसभेने घेतला आहे.

आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये नवरात्र उत्सवानिमित्ताने ७ व्या माळेच्या दिवशी मुंबादेवी मंदिरात झालेल्या ग्रामसभेत सन २०२३-२४ चा पाण्याचा ताळेबंद मांडण्यात आला. नवरात्र उत्सवात पाण्याचा ताळेबंद सादर करण्याचे हे १९ वे वर्षे आहे. याप्रसंगी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, सरपंच विमल ठाणगे, छबुराव ठाणगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Mumbai Fire :मुंबईतील आठ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
पद्मश्री पोपटराव पवार यांनी पाण्याच्या ताळेबंदाचे सविस्तर वाचन केले. त्यांनी सांगितले, १९९५ पासून आदर्श गाव हिवरे बाजार येथे पाण्याच्या ताळेबंदाच्या आधारे पिकाचे नियोजन करत आहे. त्यावेळेस फक्त १ पर्जन्यमापक होते. परंतु २००४ नंतर प्रत्येक पाणलोट क्षेत्रात स्वतंत्र पर्जन्यमापक बसविल्यामुळे अचूक पाण्याचा ताळेबंद येऊ लागला. यावर्षीच्या यावर्षी २२ दिवसात एकूण ५३८ मि.मी.पाऊस झाला. त्यातून ५२५.१५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले. त्यापैकी गावाच्या वापरासाठी ३५०.११ कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे.

गावाच्या विविध वापरासाठी वार्षिक गरज ३३३.३२ कोटी लिटर आवश्यक आहे. त्यात लोकसंख्या व जनावरे यांना पिण्यासाठी आवश्यक ७.७१ कोटी लिटर, शेतीसाठी ३१८.६१ कोटी लिटर व इतर वापरासाठी ७ कोटी लिटर अशी गरज आहे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई येणार नाही, यासाठी उन्हाळी सिंचन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्यात फक्त जनावरांचा चारा व फळबाग जगविणे एवढेच उद्दिष्ट ठेवून भविष्यासाठी १६.८० कोटी लिटर पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.

शेतीसह घरासाठी वीजनिर्मिती करणारं नगर जिल्ह्यातील अनोखं गाव

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed