• Sun. Sep 22nd, 2024
महाराष्ट्रातील ‘या’ गावात करतात रावणाची पूजा; अमोल मिटकरींची गावाला भेट, मूर्तीची पूजा आणि आरती केली

अकोला: रामायणातील खल पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रावणाला दसऱ्याला जाळण्याची परंपरा आहे. मात्र राज्यात एक गाव असं आहे, जिथे रावणाला जाळण्याची नव्हे तर रावणाच्या महापूजेची परंपरा आहे. ही परंपरा अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात असून तिथे रावणाची मूर्ती आहे. इथे रावण पूजनाची परंपरा आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी भेट दिली. त्यांनी तिथे रावणाच्या मूर्तीचे पूजन केले. याशिवाय आरती देखील केली. इतकंच नव्हे तर मंदिर उभारणी अन् सभागृहासाठी आमदार निधीतून २० लाखांचा निधी दिला आहे. विशेष म्हणजे पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा म्हणजेच रावण दहनाच्या परंपरेवर पूर्णतः बंदी आणावी, अशी मागणी येणाऱ्या अधिवेशनात मांडणार असल्याचे ते म्हणाले.
Stock Market Holiday: दसऱ्यानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी; BSE-NSE मध्ये शुकशुकाट राहणार
दरम्यान मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे. अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्याचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे. यात आश्चर्य ते काय.. परंतु अकोला जिल्ह्यातील सांगोळा हे त्याला अपवाद ठरत आहे. इथे रावणाच्या सद्गुणांमुळे रावणाची पूजा केली जाते. तब्बल ३०० वर्षांपासून ही परंपरा जोपासल्या जात आहे. वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते.

अकोला शहरापासून ४० किमीच्या अंतरावर हे सांगोळा गाव असून या गावाला ओळख मिळवून दिली आहे. ते एका दगडात कोरलेल्या सर्व आयुधानसह या रावणाच्या मूर्तीनं रावणाचे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो १० तोंड, २० हात असलेली कपटी, व्यभिचारी, अहंकारी व्यक्तीची प्रतिमा दिसते. दसऱ्या दिवशी रावण दहनासाठी रावणाची प्रतिमा उभारली जाते. पण या सांगोळा गावात दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा केली जाते. या गावात रावणाच्या मंदिरासोबत श्री राम, हनुमान, देवीचं ही मंदिर आहे. या गावची जीवनवाहिनी समजली जाणारी मन नदी आणि येथील या मूर्ती मागची कथा देखील रोचक आहे. याच मन नदीच्या काठी ऋषीमुनीचे आश्रम होते.

गावकऱ्यांची ऋषीमुनीवर खूप श्रद्धा होती. काही काळानंतर मुनी कलावश झाले. गावकऱ्यांनी महाराजांची आठवण मूर्तीच्या रुपेने संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. महाराज ज्या वडाच्या झाडाखाली तपस्या करत होते. त्या वडाच्या झाडा खाली मुनी तपस्या करत असल्याची मूर्ती तयार करण्यास मुर्तीकारला सांगितले. परंतू मूर्तिकाराच्या हाताने मुनीची मूर्ती न करता रावणाची मूर्ती केली गेली. तेव्हापासून हे गावकरी रावणाची नित्यनेमाने पूजा करत आहेत.

अब की बार, आर या पार; मराठा आरक्षणासाठी ओबीसी नेत्यांचं आमरण उपोषण; मनोज जरांगेंना दर्शवला पाठिंबा

गेल्या ३०० वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्या केली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात. ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले. पण, त्याच्या हातून घडली ती दशानन रावणाची ही मूर्ती. दहा तोंडे, काचा बसवलेले २० डोळे, सर्व आयुध असलेले २० हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती हा योगायोग श्रद्धाळू ग्रामस्थांनी हेरला. गावात लंकेश्वर स्थिरावले. गावात रावणाचे मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा होती.

राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी सरकारकडे करणार आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात सभागृहात आवाज उठवणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणाले. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावण दहनाला विरोध आहे. अमोल मिटकरींनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावाला भेट देत रावण मंदिराच्या उभारणीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या आमदार निधीतून सांगोळ्यातील मंदिर उभारणीसह सभागृह बांधकामासाठी दिलेल्या २० लाखांच्या निधीच्या कामाचं भूमिपूजन केले.
शेअर नाही हा तर कुबेरचा खजिना… अवघ्या ९ दिवसात करा पैसे दुप्पट; सतत अप्पर सर्किट तोडतोय
ते बोलताना म्हणाले की जर आदिवासी बांधवाचं दैवत असेल, तर रावण दहन कशा करता? याचे उत्तर ही अपेक्षित आहे मला म्हणून येणाऱ्या अधिवेशनात आदिवासी बांधव यांच्या मनातली जी भावना आहे, ती मांडणार आहे. रावण दहन करून त्या रावणाचा अपमान करण्यामागचं नेमकं प्रयोजन काय आहे. आज साध एखाद्या नेत्याचा फोटो जरी जाळला तर गुन्हे दाखल होतात. हा तर लंकेचा राजा होता. त्यामुळे लंकेचा राजासह शिवभक्ताचा असा पुतळा जाळणं, काही लोकांचा उद्देश हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा असतो. आज आम्ही रामाची पूजा करतो, शेवटी राम ही वंदनीय आणि रावणही वंदनीय आहे, असेही म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed