• Mon. Mar 16th, 2026

    ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा

    ललित पाटील प्रकरणात फडणवीसांचा गंभीर आरोप, उद्धव ठाकरेंसोबतच्या कनेक्शनबाबत खळबळजनक दावा

    मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. ललित पाटील हा ससून रुग्णालयात पोलिसांच्या ताब्यात असताना पळून गेला होता. यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढताना ललित पाटील प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत एक गौप्यस्फोट केला. यावेळी फडणवीसांनी ललित पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य कनेक्शनवर बोट ठेवले. त्यामुळे आता या सगळ्याला ठाकरे गट कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    Lalit Patil: मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं, कुणाकुणाचा हात सगळं सांगणार; ललित पाटीलचं कॅमेऱ्यासमोर वक्तव्य

    ललित पाटील याला डिसेंबर २०२० मध्ये अटक झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनीच ललित पाटील याच्याकडे तेव्हाच्या शिवसेनेचे नाशिक जिल्ह्याचे प्रमुखपद सोपवले होते. ललित पाटील याला अटक झाल्यावर लगेच पीसीआर मागण्यात आला. गुन्हा मोठा असल्याने याप्रकरणात लगेच पीसीआर देण्यात आला. ललित पाटील याला पीसीआर मिळाल्याबरोबर त्याला लगेच ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर सरकारी पक्षाकडून ललित पाटीलच्या चौकशीसाठी कोणताही अर्ज करण्यात आला नाही. पोलिसांकडून ललित पाटील याची चौकशीच झाली नाही. पीसीआरचा १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ललित पाटील याला एमसीआर द्यावा लागला. या काळातही त्याची चौकशीच झाली नाही. चौकशी झाली नसेल तर उद्या एखाद्या आरोपीविरुद्ध न्यायालयात खटला भरायला झाला तर तो कसा भरणार?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ललित पाटीलची चौकशी का झाली नाही? यामागील कारण काय होतं? या सगळ्याला उद्धव ठाकरे जबाबदार होते की गृहमंत्री जबाबदार होते. ललित पाटीलची चौकशी न करण्यासाठी कोणाचा दबाव होता. या प्रकरणात खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण मी त्या आत्ताच सांगणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला.

    राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय ड्रग्जचा धंदा शक्य नाही, ललित पाटील हा प्यादा, खरा मास्टरमाईंड कोण? पटोलेंचा सवाल

    कंत्राटी भरतीचा जीआर रद्द

    या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. आधीच्या सरकारांनी केलेले पाप आपल्या माथी नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या भरतीला सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीनेच केली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशीर्वादाने त्यांनीही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली असून कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करणार आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

    नार्को टेस्ट करा, ललित पाटील प्रकरणात मोठ्या मंत्र्याचा हात | सुषमा अंधारे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed