• Sun. Mar 8th, 2026
    पतीनिधनानंतर संसार सावरला, अशिक्षित माऊलीनं दहा लेकरांना केलं उच्चशिक्षित, तिघं निष्णात डॉक्टर

    नंदुरबार : आई ही संघर्षाची विद्यापीठ मानली जाते. नंदुरबार जिल्ह्यातल्या अशाच एका आदिवासी मातेने आपल्या एक-दोन नव्हे तर तब्बल १० लेकरांना प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकवत त्यांच्यावर विद्यासंस्कार करत त्यातील तिघांना उच्चशिक्षण देत डॉक्टर बनवलं. यातील एक मुलगा जिल्ह्यातला पहिला जॉईंट रिप्लेसमेट सर्जन झाला असला तरी आजही काळ्यामातीशी नाळ जुडलेली ही माता शेतात राबतांना अनेक आदिवासी महिलांसाठी आदर्श ठरत आहे.

    शेतातल्या पाण्याच्या पाईपांना जॉईंट देणाऱ्या या ६२ वर्षीय जेबलीबाई पावरा जिल्ह्यातल्या पहिल्या जॉईंट रिप्लेसमेट सर्जन डॉ. सुनिल पावरा यांच्या माता ठरल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेल्या उमराणी गावात राहणाऱ्या जेबलीबाई पावरा यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत आपल्या संसाराचा मळा फुलवला. नवऱ्याच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर आपल्या एक-दोन नव्हे तर १० मुलांच्या संसाराचा गाडा त्यांनी सुखाने ओढला. आज त्यांच्या स्वप्नांचा बगीचा फुलला आहे. जेबलीबाई यांच्या ६ मुलींपैकी ५ मुलींचे लग्न झाले असून ४ मुलांपैकी तीघांचे देखील लग्न झाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या चार मुलांमधील तीन मुले आज उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर झाली असून सर्वात मोठा मुलगा हा एमए बीएडसह त्यांना शेतीत हातभार लावतो.

    स्वतःचं स्वप्न पूर्ण नाही झालं तर काय झालं, पण आज केएल राहुलमुळेच विराटने झळकावले शतक
    स्वत: अशिक्षीत असलेल्या जेबलीबाई यांनी शिक्षणाच्या महत्वाची कास ओळखत मुलांना उच्चशिक्षित केले. आज त्यांचा एक मुलगा जिल्ह्यातील पहिला जॉईंट रिप्लेसमेट सर्जन ठरला आहे. तर दुसरा भाऊ जे.जे वैद्यकीय महाविद्यालयातत आणि तिसरा कुपर रुग्णालयात कार्यरत आहे. शेतीत फुलवलेली भाजी पिकवून तिला विकून त्यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाचा वज्रअस्त्र पेलला आहे. मात्र, मुलं शिकली सवरली तरी आजही हातात विळा घेवून त्या आदिवासी पद्दतीने शेतात न चुकता काम करताना दिसतात. आईला या वयात कष्ट करताना पाहून त्यांची उच्च शिक्षीत मुले देखील त्यांना गावाकडे आल्यानंतर शेतात मदतीसाठी पुढे सरसावतांना दिसून येतात.

    अशी ही माय मुलांच्या शिक्षणासाठी कधी अर्धपोटी तर कधी उपाशी राहून एका पातळीवर या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी तर दुसऱ्या पातळीवर आदिवासी समाजातील अज्ञान आणि अंधकार दूर लाटण्यासाठी लढली आहे. चूल आणि मुल या संकल्पनेत अडकून न राहता स्वत:च्या मुलांना आणि सुनांना स्वयंपुर्ण करणाऱ्या जेबलीबाई यांचा परिवार आज नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने आदर्शच म्हणावा लागेल.

    राज्यात शिक्षणात सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारमध्ये अशा काही अशिक्षीत जेबलीबाई पुढे येऊन त्यांनी जर समाजाच्या, स्वत:च्या परिवाराच्या परिवर्तनासाठी कंबर कसली तर ही आधूनिक रणरागीनी आदिवासी समाजाचा चेहरा मोहरा बदलल्या खेरीज राहणार नाही.

    Pune News: पुण्यात भाजपच्या माजी नगरसेविकेच्या नवऱ्याने बिल्डरला चोपलं, पटेल समाज नाराज, महेश लांडगेंकडून माफी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed