• Wed. Sep 25th, 2024
Pune News: डोक्यावरचा हंडा खाली उतरला, २५ वर्षांचा वनवास संपला; गावच्या नागरिकांच्या भावना

पुणे : ‘पू्र्वी विहिरीवरून पाणी भरत होतो. नंतर सार्वजनिक नळकोंडे आले. पाणी भरण्यासाठी सकाळी सकाळी पायपीट करावी लागायची. गर्दी व्हायची. कधी भांडणेही व्हायची. जलजीवन योजना आली आणि गावातील महिलांचा त्रास वाचला. नळामुळे घरात पाणी आले आणि २५ वर्षांपासूनचा होणारा आमचा त्रास संपला. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्यासाठी दूरवर होणारी पायपीटही थांबली. आता पाणी साठवता येते. शेताकडे लवकर जाता येते,’ अशा भावना व्यक्त केल्या आहेत गुंजवणे गावातील नामदेव रसाळ यांनी.

ऐतिहासिक वारसा तरीही…

गुंजवणेचे सरपंच गुलाब रसाळ गावाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘वेल्हे तालुक्यातील गुंजवणे गावाला ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व आहे. राजगड किल्ल्याच्या पायथ्याला असलेले गाव म्हणून ओळखले जाते; तसेच गुंजवणी धरणापासून गाव १८ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वाधिक पाऊस याच वेल्हे तालुक्यात होतो. मात्र, गावांमध्ये पाणी साठविण्यासाठी सुविधेअभावी पावसाचे पाणी वीर धरणात वाहून जाते. गावाजवळ असलेल्या गुंजवणी नदीवर गुंजवणी धरण, दुसरीकडे वीर धरण अशी याची भौगोलिक स्थिती; पण वेल्हा तालुक्यातील पावसाचे पाणी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव; तसेच वीर धरणात जाते. त्यांनाच पावसाच्या पाण्याचा उपयोग होतो. गावाची लोकसंख्या एक हजार असून, ते बारा वाड्यांत विखुरलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून गाव वसले आहे. गुंजण मावळ खोऱ्याचा (गुंजण मावळ खोऱ्यातील ८४ गावे) कारभार येथूनच हाकला जात असे. तरीही गावातील नागरिकांसह महिलांच्या वाट्याला अनेक वर्षे पाण्यासाठी पायपीट आली; पण जलजीवन योजनेमुळे आता हा त्रास बंद झाला आहे.’

Pune News: जिल्ह्यातील गावे ‘पाणीदार’, गावकऱ्यांची तहान भागली, डोळ्यांतील पाणी लुप्त
३०० वर्षांपूर्वीच्या विहिरीचा आधार

गावात पाण्यासाठी ३०० वर्षांपासून असलेल्या एका विहिरीचा आधार होता. त्या विहिरीला दर वर्षी पाणीसाठा वाढविण्यासाठी उपाययोजना केल्या जात होत्या. गेल्या दोन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन योजना आली आणि विहिरीचे खोलीकरण, रुंदीकरण झाले. त्यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. गावासह परिसरातील नागरिकांना पूर्वी याच विहिरीचा आधार होता.

पायपीट थांबली, त्रास संपला

‘घरात पाणी आल्याने काम हलके झाले. पायपीट थांबली आहे. पूर्वी संपूर्ण दिवस पाण्यासाठी जात होता. आता आराम करायला वेळ मिळतो. अर्ध्या तासात घरातील पाणी भरून होते,’ अशा भावना लता शिळीमकर यांनी व्यक्त केल्या.

डोक्यावरचा हंडा खाली उतरला

‘जलजीवन’ योजनेमुळे गावाचा फायदा झाला. पाणी घराघरात पोहोचले. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळाले. पूर्वीसारखी नळावरील भांडणे होत नाहीत. आता ‘जलजीवन’च्या हर घर जल योजनेमुळे डोक्यावरचा हंडा खाली उतरला,’ अशा भावना उपसरंपच बाळासाहेब पवार बोलून दाखवितात. योजनेमुळे गाव, कुटुंबे आनंदी झाल्याचे विद्या रसाळ यांनी सांगितले.

पूर्वी काही घरांभोवती नळकोंडे असायचे. त्या नळकोंड्यावर पाण्यासाठी पहाटेपासून गर्दी व्हायची. कधी विहिरीवर पाण्यासाठी जावे लागत होते. डोक्यावर हंडा, हातात बादली असेच चित्र पहायला मिळायचे. ‘जलजीवन’मुळे पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. घरात नळाचे कनेक्शन आले. त्यामुळे पायपीट थांबली.

– पारुबाई रसाळ

५७७४

पारुबाई रसाळ (गुंजवणे, वेल्हे)

५८१६/५८२७

घरात पाणी आल्याने गुंजवणेतील नामदेव रसाळ आता आरामात इतर कामांवर लक्ष देऊ लागले आहे.

५८४७/५८४८

जलजीवन मिशन योजनेची पाइपलाइन आता गावागावांपर्यंत झाली आहे. काही गावांमध्ये सोयीनुसार त्या उघड्यावर ठेवण्यात आली आहे.

५८८०/५८९१

घराघरात नळ पोहोचले. त्यामुळे पाणी भरणे सोपे झाले आणि मुलींसह महिलांची पायपीट थांबली.

Sanjay Raut: भुजबळांची वक्तव्यं समाजात फूट पाडणारी; मराठा आरक्षणाचा विषय संयमाने हाताळावा: संजय राऊत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed