यावेळी रोहित पवार म्हणाले की, माझ्यावर बोलताना सर्वजण उड्या मारतात. पण अजित दादांवर जेव्हा एकदा भाजपचा छोटा नेता बोलतो त्यावेळी मात्र सर्वजण गप्प बसतात. कारण भाजपला त्यांना खुश करायचं आहे. तसेच सुनील शेळके यांनी जे आरोप केले त्यात काही तथ्य नसून ते हास्यास्पद आहेत. तसेच निधी वाटप करताना ब्लॅकमेलिंगचे काम सध्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. हे चुकीचे असून आतापर्यंत कधीच असे झालेले नाही. सत्तेसाठी पवार साहेबांच्या जवळचे नेते तिकडे गेले त्यांनी दगा दिला. त्यामुळे आम्ही आता संघर्षाची भूमिका घेतली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे भला माणूस आहे. पण त्यांच्यावर दबाव असू शकतो. त्यामुळे त्यांना दिल्लीला जावे लागत आहे. त्यामुळे शिवसेना फुटीचा निकाल शिंदे गटाविरुद्ध घेणार नाहीत. न्यायालयाकडून निकाल लागला असे प्रयत्न सुरू असल्याचे देखील रोहित पवार यांनी सांगितले.