• Sun. Jun 14th, 2026
    धनगर आरक्षणाची धग आणखी वाढणार; यशवंत सेनेच्या मदतीला धावली संभाजी ब्रिगेड

    अहमदनगर : केंद्र सरकारने अन्य काही राज्यांप्रमाणे धनगर समाजाला ओबीसीऐवजी अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी चौंडी (ता. जामखेड) येथे यशवंत सेनेतर्फे गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. संभाजी ब्रिगेडने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी उपोषणस्थळी येत आंदोलकांची भेट देऊन पाठिंब्याचे पत्र दिले. ‘धनगड की धनगर’ या शब्दच्छलामुळे धनगर समाजाला महाराष्ट्रात एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळत नाही. त्यामुळे धनगर समाजाचे हजारो कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून संघर्ष करत आहेत. त्याला आमचा पाठिंबा आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

    माजी राज्यमंत्री बाळासाहेब दोडताळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. आंदोलनातील काही आंदोलकांची तब्येत खालावली आहे. उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सुरेश शिवाजीराव बंडगर यांनाही सलाईन लावण्यात आले आहे. आता संभाजी ब्रिगेडही या आंदोलनात उतरत आहे.

    Maharashtra Rain News : राज्यात आज पावसाचं सावट; मुंबई, पुण्यासह या भागांना हवामान खात्याचा इशारा

    संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे की, ‘यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. या उपोषणास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संभाजी ब्रिगेड महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी आपणास पाठिंबा देत आहोत. पुढील संपूर्ण लढ्यात आम्ही सर्व ताकदीनिशी सहभागी होऊ. यापुढेही आपण जो योग्य तो निर्णय घ्याल, संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही आपल्यासोबत आहोत. धनगर आरक्षणाचा लढा साठ वर्षापासून सुरू आहे. ‘धनगड की धनगर’ या शब्दच्छलामुळे धनगर समाजाला महाराष्ट्रात एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळत नाही. म्हणून धनगर समाजाचे हजारो कार्यकर्ते बऱ्याच वर्षापासून संघर्ष करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात यायचे असेल तर समाज हा शिक्षित व आरक्षित असलाच पाहिजे तरच प्रतिनिधित्व मिळेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आंदोलनाची धग प्रचंड आहे. प्रत्येक समाजबांधव पोटतिडकीने लढत असून सरकार मात्र निगरगठ्ठपणे हा सर्व संघर्ष लांबून पाहत आहे. याविरोधात अजून ताकदीने आपणा सर्वांना मिळून संघर्ष करावा लागेल. आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे, ते धनगर समाजाला त्यांच्या हक्काचं मिळालंच पाहिजे,’ असंही संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed