• Sat. Sep 21st, 2024

मोठी बातमी: उपोषणाचा ९वा दिवस, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी सलाईन लावलं

मोठी बातमी: उपोषणाचा ९वा दिवस, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी सलाईन लावलं

जालना: मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून मनोज जरांगे यांच्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. तरीही मराठा आरक्षण मिळवण्याचा मनोज जरांगे यांचा निर्धार तसूभरही ढळलेला नाही. मात्र, यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. काल राज्य शासनाचे शिष्टमंडळ येऊन जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा करून गेले. तरी मनोज जरांगे हे आरक्षणाचा GR आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. आज ९ व्या दिवशी मात्र मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना सलाईन लावली आहे. काल संध्याकाळपासून मनोज जरांगे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे डॉक्टर्स त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवून होते. त्यामुळे मराठा आंदोलकांमधील अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे.

‘मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. गरज भासल्यास सलाइन लावतो,’ अशा शब्दांत आंदोलक मनोज जरांगे यांनी मंगळवारी भूमिका मांडली होती. ‘मराठा आरक्षणासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. तुम्ही किमान एक महिना वेळ द्या,’ असे महाजन यांनी सांगितले. मात्र, त्यास जरांगे यांनी नकार दिला. त्यामुळे अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण सोडविण्यात पुन्हा अपयश आले होते.

पत्र्याचं घर, दोन खोल्यांमधला संसार; आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या मनोज जरांगेंच्या गरिबीची कथा

आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या उपोषणस्थळी मंगळवारी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, सतीश घाटगे यांनी भेट देऊन चर्चा केली. ‘सरकारला तीस दिवसांची मुदत द्या, तांत्रिक अडचणी आहेत, समिती कदाचित दहा-पंधरा दिवसांत काम करील, तुम्हीही मुंबईत येऊन समितीबरोबर मदत करा,’ असे महाजन यांनी सरकारतर्फे सांगितले. मात्र, मुंबईत येण्यास जरांगे यांनी नकार दिला.

जरांगे पाटील म्हणाले, ‘विदर्भाला कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळते, मग तुम्ही मराठवाड्यासाठीदेखील ते द्यायला हवे. आरक्षण देणे सरकारच्या हातात आहे. तुमचे ऐकून खूप वेळा आंदोलन मागे घेतले. आता आरक्षणाशिवाय उठणारच नाही. मला कोणालाच नाराज करायचे नाही. मी इथे शांततेत बसून राहतो. कोणालाही काही बोलत नाही. विनाकारण मी ताणून धरीत नाही. आरक्षण दिल्याचा मुख्यमंत्री आणि सचिवांची सही असलेला अध्यादेश द्या, आणखी चार दिवसांची मुदत त्यासाठी घ्या. तेव्हा तुमचे स्वागतच करेन आणि उपोषण सोडेन. ’

Manoj Jarange: सरकारला फक्त एका ओळीचा जीआर काढायचाय, कोर्टात चॅलेंज होणार नाही; मनोज जरांगेंनी सांगितलं कारण

जरांगे पाटील यांचे राऊतांकडून कौतुक

जालन्यामध्ये एका लहानशा खेड्यामध्ये उपोषणाला बसलेला जरांगे पाटील तुमच्या प्रलोभनांना वा दबावाला झुकत नाही याचे कौतुक आहे. महाराष्ट्राला सरकारने दिलेली वचन पोकळ आणि फसवी होती. सोमवारी एक आमदार आणि जामनेरचे एक मंत्रीही भेटायला गेले. परंतु आंदोलन संपले नाही. ५० खोक्यांनी विकली जाणारी वा खोक्यांसमोर झुकणारी ही माणसे नाहीत. साधी गरीब फाटकी माणसं आहेत. ती न्यायासाठी लढा देत आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर मंगळवारी भाष्य केले.

जरांगे पाटलांना काही झाल्यास आम्ही सरकारला पायउतार होण्यास भाग पाडू, बीडमधील रणरागिनी आक्रमक!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed