महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आता जी काय डोकी फोडली आहेत त्याचं श्रेय या सगळ्यांनी टीम वर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे. मी तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मला असं वाटतं की आता एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आजपर्यंत इतक्या निघृणपणे सरकार वागलेलं नाही नजीकच्या काळात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ट्रिपल इंजिन निघृणपणे कारभार करत आहे. कुणीही न्यायहक्कांसाठी रस्त्यावर यायचं नाही, आलं तर डोकी फोडून टाकू, माता भगिनी बघणार नाही घरात घुसून मारू याचा प्रत्यय बारसूमध्ये आला होता. जे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी मानतं ते वारकऱ्यांवर लाठ्या मारतं हे पटत नाही.
आताचा निघृण अत्याचार केलेला आहे. हे सांगणार पोलिसांनी केलं, पोलीस म्हणणार लाठ्यांनी केला. आदेश कुणी दिला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मी जातीपातीनं बघत नाही पण फडणवीस वेगळे काढले तर एक फूल आणि एक हाफ त्यांचं काय चाललंय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
लाठीमार करण्यासाठी बाहेरुन माणसं आणली होती का? लाठीमार कुणी केला? बारसूमध्ये लाठीमार कुणी केला होता. एका शाळकरी मुलाला देखील मारहाण केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. संघनायक म्हणून माझ्यावर प्रकरण टोलावता तर मग यावेळी लाठी हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.