• Wed. Mar 11th, 2026

    एक फुल दोन हाफनं राजीनामा द्यावा, अजित पवारांचं लॉजिक वापरत उद्धव ठाकरेंचा पलटवार

    एक फुल दोन हाफनं राजीनामा द्यावा, अजित पवारांचं लॉजिक वापरत उद्धव ठाकरेंचा पलटवार

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांना समजदार माणूस समजत होतो, मी संघनायक होतो, माझं नक्की काय चुकलं, ते चुकत होतं तेव्हा हे विकेकटकीपर काय करत होते, ते संघात होते ना? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. त्यावेळी मी अनेकांशी चर्चा करत होतो, कुठेही वकील बदलले नव्हते, या आंदोलनकर्त्यांचे वकील देखील तिकडे होते, असं ठाकरे म्हणाले.

    महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आता जी काय डोकी फोडली आहेत त्याचं श्रेय या सगळ्यांनी टीम वर्क म्हणून स्वीकारलं पाहिजे. मी तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मला असं वाटतं की आता एक फुल दोन हाफ यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. आजपर्यंत इतक्या निघृणपणे सरकार वागलेलं नाही नजीकच्या काळात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    हे ट्रिपल इंजिन निघृणपणे कारभार करत आहे. कुणीही न्यायहक्कांसाठी रस्त्यावर यायचं नाही, आलं तर डोकी फोडून टाकू, माता भगिनी बघणार नाही घरात घुसून मारू याचा प्रत्यय बारसूमध्ये आला होता. जे सरकार स्वत:ला हिंदुत्ववादी मानतं ते वारकऱ्यांवर लाठ्या मारतं हे पटत नाही.
    मोठ्या चुका करूनही भारताने रचला विजयाचा पाया, मॅच संपण्याआधीच नेपाळचे आव्हान संपुष्टात
    आताचा निघृण अत्याचार केलेला आहे. हे सांगणार पोलिसांनी केलं, पोलीस म्हणणार लाठ्यांनी केला. आदेश कुणी दिला असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मी जातीपातीनं बघत नाही पण फडणवीस वेगळे काढले तर एक फूल आणि एक हाफ त्यांचं काय चाललंय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
    गौतमी पाटीलवर दु:खाचा डोंगर; वडिलांचे निधन, पुण्यातील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
    लाठीमार करण्यासाठी बाहेरुन माणसं आणली होती का? लाठीमार कुणी केला? बारसूमध्ये लाठीमार कुणी केला होता. एका शाळकरी मुलाला देखील मारहाण केली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. संघनायक म्हणून माझ्यावर प्रकरण टोलावता तर मग यावेळी लाठी हल्ल्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

    मराठवाड्यातच आरक्षण लढा तीव्र का होतो? इतर विभागात कुणबी मग तिथे नाहीत का? धगधगत्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा रिपोर्ट

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *