• Sat. Sep 21st, 2024
तरुण काम आटपून घरी निघाला; घरी पोहोचण्याआधीच अनर्थ, कुटुंबाच्या आक्रोशानं मन सुन्न

नवी मुंबई: रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येकालाच घरातून निघताना आई वडिलांसह सोबत असणाऱ्या जवळच्या व्यक्ती सावकाश जा, हळू गाडी चालव, असं आवर्जून सांगत असतात. मात्र अनेक वेळा ह्या वाक्याकडे तरुण मुलांसह इतरही व्यक्ती दुर्लक्ष करत असतात. मग दुर्दैवी प्रसंगाला अनेक वेळा सामोरे जावे लागते. त्यात तरुणाईमध्ये बाईक चालवताना कोणत्याही नियमांचे पालन न करता भरधाव वेगाने गाडी चालवली जाते. यानंतर अनेक वेळा भयानक अपघाताचा सामना तर करावा लागतोच त्यात अनेक वेळा जीव देखील गमवावा लागतो.
तरुण दारूच्या नशेत तर्राट; रुळावर जाऊन झोपला, रेल्वेचे तीन डबे अंगावरून गेले, अन् नंतर जे घडलं त्यानं…
अशीच एक घटना मुंबईतून मुलुंड-ऐरोलीमार्गे दिघा येथे जाणाऱ्या तरुणाच्या आयुष्यात घडली आहे. मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री मुलुंड-ऐरोली पुलावर घडली आहे. ह्या घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच हा तरुण दिघा येथील घरी जात होता. मात्र त्याचा घरी पोहचण्याअगोदरच अपघात झाला. त्यात त्याचा करुण अंत झाला आहे. घरी जाण्यासाठी निघालेल्या ह्या तरुणाला घरी पोहचायच्या अगोदरच रस्त्यात जीव गमवावा लागला आहे. घटना घडताच ताबडतोब घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. रबाळे पोलिसांनी या भीषण अपघाताप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

महाराष्ट्रातल्या सह्याद्रीप्रमाणेच ते दिल्लीतले बादशाह, मोदी पुण्यातून लोकसभा लढणार? पुणेकरांच्या प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव अवनिंद्र राघव विश्वकर्मा (२६) वर्ष असे असून तो दिघा सुभाष नगर येथे कुटुंबासह राहण्यास होता. रबाळे एमआयडीसीमध्ये खासगी कंपनीत काम करणारा अवनिंद्र गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मुलुंडमार्गे दिघा येथे घरी जात होता. यावेळी त्याची मोटारसायकल मुलुंड-ऐरोली पुलावर आली असताना अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघातात अवनिंद्र हा जबर जखमी झाल्याने त्याला ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. ह्या भीषण अपघातामध्ये मोटारसायकलला धडक दिलेल्या व्यक्तीने तातडीने पळ काढला. ह्या भीषण अपघातामध्ये अवनिंद्र ह्याला आपला जीव गमवावा लागला आहे. या भीषण अपघाताचा नवघर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed