• Tue. Mar 10th, 2026

    Pulses Price Hike: ‘कॉमन मॅन’च्या किचन बजेटचे तीनतेरा; तूरडाळीचा भाव कडाडला, प्रतिकिलो १७० रुपयांवर

    Pulses Price Hike: ‘कॉमन मॅन’च्या किचन बजेटचे तीनतेरा; तूरडाळीचा भाव कडाडला, प्रतिकिलो १७० रुपयांवर

    लातूर: गेल्यावर्षी झालेली अनियमित पाऊसमान आणि यावर्षी दिलेली पावसानं ओढ याचा थेट परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर झाला आहे. यामुळे सर्वच खाद्य वस्तूंची भाव वाढताना दिसत आहेत. डाळींनी तर रोज भावाचा उच्चांक गाठण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची अत्यल्प आवक आहे. मागील काही दिवसात सातत्याने तुरीचे भाव वाढत आहे. बारा हजार रुपये क्विंटलने आज तुरीची बाजारात खरेदी झाली आहे. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून बाजारात ज्यावेळेस तुरडाळ येते त्यावेळेस त्याचेही भाव वाढताना दिसत आहेत. आज किरकोळ बाजारात फटका तुरडाळीचा भाव हा १७५ रुपये किलो आहे. ऐन सणासुदीत तूरडाळ महाग झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी १०० रुपयांवर असलेली तूरडाळ आता १६० ते १७५ रुपये किलोवर गेली आहे. हरभरा डाळ, उडीद डाळ, मसूर डाळ आणि मूग डाळींच्या दरातही दोन महिन्यांत सरासरी २० ते ३० रुपयांची वाढ झाली असून, डाळींच्या दरातील तेजी वर्षभर कायम राहण्याची शक्यता आहे.

    बाजारात भाव मात्र शेतकऱ्याकडे माल नाही

    बाजारामध्ये सध्या तूर आणि हरभऱ्याची आवक अत्यल्प आहे. सरकारने हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली होती. बाजारात हरभऱ्याला भाव नव्हता हमीभाव केंद्रावर उत्तम भाव होता या कारणासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या हरभरा हमीभाव केंद्र ला विकला. भारतात एकूण ९५ लाख मॅट्रिक टन हरभराचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ३० लाख मॅट्रिक टन हरभरा ची खरेदी सरकारने केली आहे. तुरीला आणि हरभऱ्याला आता बाजारभाव उत्तम मिळत असला तरी शेतकऱ्याकडे मालच नसल्याने आवक अत्यल्प आहे.

    रोज बदलणाऱ्या भावामुळे किरकोळ व्यापारी हैराण

    तूरडाळ, मूगडाळ, उडीदडाळ, हरभराडाळ, मसूरडाळ याचे दर दर दोन दिवसांनी बदलत असल्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात माल विकतही नाहीत. रोज बदलणाऱ्या भावामुळे ग्राहकांवरही त्याचा थेट परिणाम होताना दिसतोय.

    भाव कमी होण्याची चिन्ह नाहीत

    गेल्या वर्षी कमी झालेली डाळीची लागवड, अनियमित पाऊसमान याचा डाळीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यावर्षी महाराष्ट्रसह इतर राज्यातही पावसानं दिलेली ओढ याचा थेट परिणाम शेतमाल उत्पादनावर झाला आहे. यामुळे संपूर्ण देशांमध्येच डाळीचे उत्पादन यावर्षी कमी प्रमाणात आहे. याचा थेट परिणाम बाजारातील भाव वाढीवर झाला आहे. पाऊस पडेल आणि उत्पादन चांगले येईल अशी स्थिती आता राहिली नाही. पावसानं दिलेल्या ओढ याच्यामुळे उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. पुढील हंगामातच उत्पादनाची शक्यता असल्याने सर्व प्रकारच्या डाळीची भाव वाढ झाल्याचं बोलले जात आहे.

    मणिपूर, महागाई ते वंदे भारत एक्सप्रेस, संसदेत बोलताना सुप्रिया सुळेंकडून भाजपवर हल्लाबोल!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed