• Fri. Mar 6th, 2026

    पूजा करण्यासाठी चौघे जण आले अन् थोड्याच वेळात तीन मजली इमारत जमीनदोस्त, जळगावात खळबळ

    पूजा करण्यासाठी चौघे जण आले अन् थोड्याच वेळात तीन मजली इमारत जमीनदोस्त, जळगावात खळबळ

    जळगाव : जळगाव शहरातील शिवाजी महाराज नगरातील मशिदीसमोर असलेली एक तीन मजली जुनी इमारत आज सकाळी ८.३० च्या सुमारास अचानक कोसळली. यात एकूण चार जण या इमारती खाली अडकले होते. त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आलं असून एक ७५ वर्ष वय असणारी महिला या इमारतीखाली अडकली होती. तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. राजश्री सुरेश पाठक असं त्या महिलेचं नाव आहे.

    जळगाव शहरातील शिवाजी नगरात ७४ वर्ष जुनी इमारत आहे. पाठक यांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ते राहत नसल्याची माहिती समोर आली आहे. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय कधीतरी या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार या ठिकाणी आज पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाक बचाव कार्य सुरू केले. या तीन जणांना वाचविण्यात यश आलं तर एक महिला या ठिकाणी अडकलेली होती. तिला वाचवण्यासाठी ही प्रशासनाने प्रयत्न केलेआहेत. पाच तासाच्या शोधमोहिमेनंतर संबंधित महिलेचा मृतदेह सापडला असून या घटनेत तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली होती त्यानंतर नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.

    ‘शासन आपल्या दारी’ काय म्हणता, ‘दुष्काळ आपल्या दारी’ येऊन ठेपलाय, जयंतरावांचे सत्ताधाऱ्यांना खडे बोल

    मंत्री गुलाबराव पाटील यांनीही इमारत कोसळेल्या ठिकाणी भेट दिली आहे. या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट देत घटनेविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली..या ठिकाणी इमारतीचे मालक असणाऱ्या पाठक कुटुंबीयांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी धीर दिला आहे.

    इमारत खाली करण्याबाबत महापालिकेकडून देण्यात आली होती नोटीस…

    अनेक वर्षांपासून वर्षापासूनची ही जीर्ण इमारत होती. ती रिकामी करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती. दुर्घटना घडली तेव्हा या इमारतीमध्ये एकूण चार जण होते त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आल आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
    एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादीत आलेल्या ५ माजी नगरसेवकांची भाजपमध्ये घरवापसी

    जी महिला या ठिकाणी अडकली होती ती या इमारतीमध्ये राहत नव्हती. आज संबंधित महिला त्या ठिकाणी पूजेसाठी तसेच पाणी भरण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. नेमक्या त्याच वेळी ही दुर्घटना घडल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
    Maharashtra Politics: बारामतीच्या राजकारणात जय पवार सक्रिय; म्हणाले, अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिला की…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed