• Sat. Sep 21st, 2024

Satara News : चाऱ्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग, चौघांची महिलेला उसाच्या दांडक्याने जबर मारहाण

Satara News : चाऱ्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याचा राग, चौघांची महिलेला उसाच्या दांडक्याने जबर मारहाण

सातारा : जनावरांसाठी कडवळ चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करून महिलेला उसाचे दांडके व लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पानवण ( ता. माण ) येथील चौघांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवदास रोहिदास नरऴे (वय ३०), पिंटु उर्फ शांताराम रोहिदास नरळे (वय ३५), संतोष गोपाळ नरळे ( वय ३६), जनाप्पा विठ्ठल शिंदे ( वय ६०, सर्व रा. पाणवन (ता. माण ) अशी या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा नावे आहेत. यापैकी देवदास नरळे व पिंटु उर्फ शांताराम नरळे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

देवदास महादेव तुपे (वय १७, रा. पाणवन, ता. माण) याने म्हसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘शनिवार सकाळी ९च्या सुमारास पाणवन ( ता. माण ) गावच्या हद्दीत महालक्ष्मी खताच्या दुकानासमोर माझी आई शाहिदा हिने गुरांसाठी कडवळ घेण्यासाठी अगोदर दिलेले पैसे देवदास रोहिदास नरऴे यास परत मागितले असता त्याचा राग मनात धरुन देवदास नरऴे, पिंटु उर्फ शाताराम नरळे, संतोष नरळे व जनाप्पा शिंदे यांनी आपसात संगनमत करून आमची जात मातंग असल्याचे माहित असूनही त्यांनी माझी आई शाहिदा हीस पिंटु उर्फ शाताराम नरळे याने उसाने, जनाप्पा विठ्ठल शिंदे यांने काठीने मारहाण केली. तसेच देवदास नरऴे व संतोष नरऴे याने माझे आईचे डोक्याचे केस धरुन फरपटत रस्त्यावर आणून तिच्या अंगाशी झोंबाझोंब केली. मलाही चौघांनी हाताने व लाथाबुक्याने मारहाण करून तिचे मनास लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून “या मांगाट्यांना लय मस्ती आलीय, त्यांना गावातून हकलून बाहेर काढू” असे म्हणून धमकी दिली.’ या घटनेविरोधात रात्री म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान प्रकरणी उदयनराजे पोलीस अधीक्षकांच्या भेटीला

या गुन्ह्याच्या घटनेनंतर पाणवन इथे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दहिवडी व वडूज विभागाचे उपविगीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

मान-खटाव तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने चाऱ्याचा प्रश्न बिकट सुरू आहे. येथील लोकांनी जनावरांसाठी चारा विकत घ्यावा लागत आहे. अशी स्थिती असतानाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed