उपाध्यक्षांच्या बंगल्यावर याबाबत अलीकडेच बैठक झाली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार, अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या सर्व समित्यांचे सभापती प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लेकुरवाळे म्हणाल्या, पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांसह परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती मागविण्यात आली. आंदोलनानंतर ती देण्यात आली. भरती प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येते. ग्रामपंचायत सदस्यांना नियुक्त करता येणार नसल्याचे जाहिरातीत स्पष्ट होते. त्यानंतरही विहीरगाव, वाढोणा, मोरगाव आदी गावात ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली. नागपूर ग्रामीण तालुक्यातील येरला गावात तर चक्क गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेत ज्यांना जास्त गुण आहेत, अशांना प्रत्यक्ष मुलाखतीत कमी गुण देण्यात आले. तर लेखी परीक्षेत कमी गुण असणाऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीत जास्त गुण देण्यात आले. त्यामुळे आक्षेपांवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत माजी मंत्री सुनील केदार म्हणाले, ‘पात्र उमेदवारांची नियुक्ती झाली व्हावयास हवी. अनियमिततेचा असा प्रकार योग्य नाही. त्यामुळे प्रसंगी लोकायुक्तांसह न्यायालयाचेही दार ठोठावण्यात येईल.’
Nagpur News : नागपूर पोलिस पाटील भरतीत चक्क गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व्यक्तीची निवड झालीय, असा आरोप जिल्हा परिषदेच्या सत्तापक्षा नेत्या अवंतिका लेकुरवाळे यांनी केला आहे.
उपाध्यक्षांच्या बंगल्यावर याबाबत अलीकडेच बैठक झाली. यावेळी माजी मंत्री तथा आमदार सुनील केदार, अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षा कुंदा राऊत, जिल्हा परिषदेच्या सर्व समित्यांचे सभापती प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना लेकुरवाळे म्हणाल्या, पोलिस पाटील भरती प्रक्रियेत घोळ झाल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व उमेदवारांसह परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती मागविण्यात आली. आंदोलनानंतर ती देण्यात आली. भरती प्रक्रियेत अनेक अनियमितता झाल्याचे स्पष्ट दिसून येते. ग्रामपंचायत सदस्यांना नियुक्त करता येणार नसल्याचे जाहिरातीत स्पष्ट होते. त्यानंतरही विहीरगाव, वाढोणा, मोरगाव आदी गावात ग्रामपंचायत सदस्यांची निवड करण्यात आली. नागपूर ग्रामीण तालुक्यातील येरला गावात तर चक्क गुन्हे दाखल असलेल्या आरोपी व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेत ज्यांना जास्त गुण आहेत, अशांना प्रत्यक्ष मुलाखतीत कमी गुण देण्यात आले. तर लेखी परीक्षेत कमी गुण असणाऱ्यांना प्रत्यक्ष मुलाखतीत जास्त गुण देण्यात आले. त्यामुळे आक्षेपांवर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत माजी मंत्री सुनील केदार म्हणाले, ‘पात्र उमेदवारांची नियुक्ती झाली व्हावयास हवी. अनियमिततेचा असा प्रकार योग्य नाही. त्यामुळे प्रसंगी लोकायुक्तांसह न्यायालयाचेही दार ठोठावण्यात येईल.’
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.