• Tue. Jun 9th, 2026

    मुंबईत पावसाची उघडीप, विषाणूंचा फैलाव वाढला; साथीच्या आजारांबाबत महत्त्वाच्या सल्ला

    मुंबईत पावसाची उघडीप, विषाणूंचा फैलाव वाढला; साथीच्या आजारांबाबत महत्त्वाच्या सल्ला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पावसाचा जोर मुंबईमध्ये कमी झाला असला, तरी आजाराचा जोर मात्र वाढला आहे. मागील काही दिवसांपासून ताप, सर्दीखोकला, घसादुखीच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून, लहान मुलांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव वाढता आहे. यापूर्वी व्हायरल आजाराचा जोर तीन ते चार दिवस राहायचा आता मात्र, या लक्षणांची तीव्रता वाढती आहे. श्वास घ्यायला त्रास होणे, दम लागणे, श्वसनविकाराशी संबधित इतर अडचणींमध्येही वाढ झाली आहे.

    तापासोबत काही मुलांना सर्दी, खोकला तर काहींना पोटाच्या तक्रारी आहेत. हा ताप कमी होण्यासाठी किमान दोन ते तीन दिवसांचा अवधी लागतो. तोपर्यंत तापाची औषधे घेणे, भरपूर पाणी पिणे आणि विश्रांती घेणे गरजेचे आहे. काही मुलांमध्ये अशक्तपणा दिसून येतो. प्राथमिक उपचारांच्या पहिल्या टप्प्यांत प्रतिजैविके दिली जातात. या काळामध्ये मुलांना विश्रांतीची गरज असेल, तर त्यांना शाळेमध्ये पाठवू नये. ताप व्हायरल स्वरूपाचा असेल, तर इतर मुलांनाही त्याची लागण होऊ शकते. त्यामुळे मुलांनी पूर्णपणे विश्रांती घ्यायला हवी. अन्य़था आजारांची लक्षणे वाढून मुलांमध्ये हा त्रास बळावू शकतो. पावसाची उघडीप सुरू असल्यामुळे या वातावरणामध्ये विषाणूंचा फैलाव अधिक होतो. हे वातावरण अशा प्रकारच्या संसर्गजन्य तापाचा फैलाव करण्यासाठी पोषक असते. त्यामुळे या स्वरूपाच्या तापाच्या रुग्णांची संख्या शहरामध्ये वाढली आहे.

    पावसाळ्यात साथीचे रोग डोकं वर काढतायत, ठाण्यात पिण्याच्या पाण्याला दुर्गंधी, रहिवाशी चिंतेत

    व्हायरल स्वरूपाच्या संसर्गामुळे मुलांमध्ये आजाराची तीव्रता वाढली असली, तरीही रुग्णालयामध्ये दाखल होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नाही. ते नियंत्रित असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. एन.एस. पाटील यांनी सांगितले.

    मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप

    इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. संतोष कदम यांनीही लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप या स्वरूपाचा त्रास वाढल्याचे सांगितले. पावसाची उघडीप सुरू झाल्यापासून या रुग्णसंख्येमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मुलांच्या खेळाच्या, अभ्यासाच्या ठिकाणी एकाला जरी व्हायरल स्वरूपाचा ताप आला असेल तर इतर मुलांनाही त्याचा संसर्ग होतो. हे वातवारण व्हायरल स्वरूपाच्या तापासाठी पोषक असते. अनेक मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे या संसर्गाचा प्रादुर्भाव मुलांमध्ये लगेच होतो.

    डोळे येणे साथीचा आजार म्हणजे काय जाणून घ्या डॉ. निरीन डोंगरे यांच्याकडून

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed