• Sat. Sep 21st, 2024

मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, राणेंनी घेतलेल्या ४५ आमदारांच्या सह्या: भास्कर जाधव

मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, राणेंनी घेतलेल्या ४५ आमदारांच्या सह्या: भास्कर जाधव

रत्नागिरी: कोकणात भास्कर जाधव यांची विविध कार्यक्रमांमधून होणारी भाषण राजकीय चर्चेचा विषय ठरली आहेत. इतकेच नव्हे त्यांनी खेड तालुक्यात सवेणी येथील कार्यक्रमात दापोली मतदारसंघातून संजय कदम यांनाच आमदार करायचे आहे लक्षात ठे,वा असे सांगत विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकल आहे. कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार शिवसेनेचे माजी मंत्री व तत्कालीन पालकमंत्री रवींद्र माने यांच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भास्कर जाधव यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, विद्यमान केंद्रीय मंत्री व तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्याबद्दल दोन मोठे किस्से सांगत पुन्हा एकदा जुन्या घडून गेलेल्या कथित राजकीय गोष्टींना उजाळा देत मी तत्वासाठी लढतो कोणत्याही धर्माच्या जातीच्या विरोधात मी कधीच नाही असंच अप्रत्यक्षरीत्या सांगितले.

या कार्यक्रमाला व्यासपीठावरती माजी मंत्री रवींद्र माने, खासदार विनायक राऊत, विद्यमान आमदार राजन साळवी,शेखर निकम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार सुभाष बने असे अनेक आजी-माजी पदाधिकारी व काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.

बाळासाहेब ठाकरे यांनी रवींद्र माने यांना मंत्री केल्यावर रामदास कदम यांनी सगळ्या आमदारांना एकत्र करत माने यांना काढा व मला मंत्री करा यासाठी सही करायला सांगितली. अनेक आमदारांनी सह्या केल्या होत्या पण पण सही केली नाही. मी सांगितलं की रवींद्र माने यांना पण ठेवा आणि रामदास कदम यांनाही मंत्री करा दोघांना मंत्री करा आमच्या जिल्ह्यात दोन मंत्रिपद द्या असं सांगणार असाल तर मी तुमच्या बरोबर येतो सही करतो हे सांगणारा मी एकमेव होतो, याची आठवण त्यांनी रवींद्र माने यांना करून दिली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; काय झाली भेटीत महत्त्वाची चर्चा?

यानंतर भास्कर जाधव यांनी मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेला एक किस्सा सांगितला. मनोहर जोशी हा ब्राह्मण मुख्यमंत्री नको, मुख्यमंत्री बदला, यासाठी नारायण राणेंनी मराठा आमदारांच्या सह्यांचे पत्र घेतले होते. ४५ आमदारांनी सह्या केल्या नारायण राणे आणि माझं अत्यंत सख्यं होतं, उत्तम जवळचे संबंध होते. पण त्या त्यावेळेला मनोहर जोशींना काढायचे की नाही, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठरवतील. परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री नको मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून मी सही करणार नाही, असं रामदास कदम व नारायण राणे यांच्यासमोर सांगणारा मी एकमेव होतो, अशी आठवण भास्कर जाधव यांनी सांगितली.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले व एके काळचे कट्टर राणे समर्थक असलेले संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने तुम्ही तेव्हा माझं ऐकलं असतं तर आजपर्यंत आमदार राहिला असतात. हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून कधीही जाणार नाही असा रिपोर्ट होता. पण तुम्ही ऐकले नाहीत तुम्ही आजवर आमदार राहिला असतात अगदी आजपर्यंत. या वाक्यावर जोर देत व्यासपीठावर उपस्थित असलेले चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनाही त्यांचा कोणता उल्लेख न करता सांगितलेला हा तिसरा किस्साही मोठा चर्चेचा विषय ठरला. बने राहिले असते तर शेखर निकम तुम्ही आमदार झाला नसता, असं कोणतेही थेट वक्तव्य न करता अप्रत्यक्षरीत्या सुचक विधान केलं आहे.पण सुभाष बने तुमचे त्यावेळी सगळे इमान म्हणजे दादा… राजकारण म्हणजे दादा…दादा म्हणजे नारायण राणे असं सांगत भास्कर जाधव यांनी खास शैलीत ग्रामीण भाषेत केलेली ही नक्कल सगळ्यांनाच हसवणारी ठरली. यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यात कायम संघर्ष आहे व संघर्ष हीच माझी एनर्जी असावी असे सांगत यापुढे राजकीय संघर्ष अटळ आहे असे संगत आपल्या भाषणातून त्यांनी चिपळूण संगमेश्वर मतदार संघात सूचक इशारा दिल्याचे बोलले जात आहे.

माझं कोकणातलं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन आला; नारायण राणेंनी सांगितला तो भावुक प्रसंग

माने साहेब आज तुमचा ६५ वा वाढदिवस आहे. तुमचं राजबिंड, हँडसम व्यक्तिमत्व याबद्दल आम्ही येताना चर्चा करत होतो. पण काय रे ह्या माणसाला असा आजार जडला झाला असं दुःखही व्यक्त करत भास्कर जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्या प्रत्येक प्रसंगात मागे ठामपणे उभे राहिलेल्या त्यांच्या पत्नीचेही भास्कर जाधव यांनी कौतुक केलं.माने यांनी मंत्री असताना केलेल्या कामांचाही आवर्जून उल्लेख जाधव यांनी केला.

आपण ट्रक ड्रायव्हर होतो तेव्हा…

१९८६-८७ च्या कालावधीत आपण ट्रक ड्रायव्हर असताना ट्रक देवगडवरून अप्पासाहेब गोगटे यांचा आंबा घेऊन लोड करून घेऊन मी निघालो होतो. त्यावेळेला मी रवींद्र माने यांना ओळखतही नव्हतो त्यावेळेला माझ्या शेजारी बसलेल्या राजू भागवत यांनी मला वाटेत ट्रक थांबवण्यासाठी सांगितले व मी माझ्या स्वभावानुसार ट्रक थांबवून त्या व्यक्तीला केबिनच्या वर बसायला सांगितले. भागवत यांनी सांगितले अहो तुम्ही ज्याला वरती बसवले तो आपला तालुकाप्रमुख आहे पण मी ट्रक चिपळूपर्यंत तसाच नेला व चिपळूणमध्ये आम्ही थांबलो त्यावेळेला झालेली रवींद्र माने व माझी पहिली भेट झाली. मग आम्ही चिपळूण ते मुंबई असं प्रवास बोलत बोलत केला, हा किस्साही भास्कर जाधव यांनी सांगितला. भास्कर जाधव यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेल्या विविध किस्से सांगत व्यासपीठासह सगळ्यांनीच भरभरून प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed