• Sun. Jun 14th, 2026

    इंडियाच्या बैठकीचं प्लॅनिंग,मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल,शरद पवारांकडून स्टँड क्लिअर

    इंडियाच्या बैठकीचं प्लॅनिंग,मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल,शरद पवारांकडून स्टँड क्लिअर

    छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्या बीडला सभा घेणार असून त्यानंतर मुंबईल जाणार असल्याचं सांगितलं. मुंबईत गेल्यावर पक्षाचे नेते जसा कार्यक्रम ठरवतील त्यानुसार पुढचं नियोजन असेल, असं शरद पवार म्हणाले. आम्ही विरोधी पक्षांनी बिहार आणि कर्नाटकमध्ये दोन बैठका घेतल्या होत्या. तिथं सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही राजकीय पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते. विरोधी पक्षांच्या मंचाला इंडिया हे नावं दिलं होतं. आता ३१ ऑगस्टला मुंबईत बैठक होणार आहे. या पक्षांची १ तारखेला देखील सभा असेल, असं शरद पवार म्हणाले.

    सामूहिक आणि एकत्र लढून मोदी सरकारला पर्याय कसा द्यायचा आणि जनमत कसं करायचं याबाबत विचार करत आहोत. हे तातडीनं करणं गरजेचं आहे कारण समाजात उन्माद वाढेल असे निर्णय मोदी सरकार घेत आहे, असं शरद पवार म्हणाले. आपल्या देशातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. सीबीएसईच्या नियंत्रणाखाली त्या शाळा आहेत. १० ऑगस्टला त्यांनी एक परिपत्रक काढलं आहे. १४ ऑगस्ट २०२३ हा दिवस विभाजन विभीषिका स्मृति दिवस म्हणून पाळायला सांगितला. भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली होती. त्यानंतर काही घटना घडल्या होत्या, त्यामुळं जी कटूता निर्माण झाली होती ती अनेक दिवस उत्तर भारतात कायम होती. फाळणीच्या वेळी घडलेल्या घटनांबाबतचं स्मरण करण्याचं पत्रक काढण्यात आलं, असं शरद पवार म्हणाले.

    आम्ही जे सातत्यानं सांगतोय की हे सरकार समाजात कटुता वाढवतंय, जाती धर्मात अंतर वाढवतंय, म्हणून मी पत्रकार परिषदेत हे सांगितलं आहे, असं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना म्हणून आम्ही हा मुद्दा इंडियाच्या बैठकीत मांडू, इंडियाचे जे घटक आहेत त्यांना याबाबत त्यांच्या राज्यात आक्रमक भूमिका घ्यायला सांगणार आहे, असं शरद पवार म्हणाले.

    भाजपनं निवडून आलेली सरकार पाडली. गोव्यातील सरकार केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन ते सरकार पाडलं गेलं. मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वात सरकार होतं, ते सरकार पाडलं गेलं. त्या ठिकाणी भाजपचं सरकार आणलं गेलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, त्याची विल्हेवाट कशी लावली हे सांगायची गरज नाही. अनेक ठिकाणी लोकांनी निवडून सरकारं पाडणं हा कार्यक्रम मोदींच्या नेतृत्त्वातील सरकार केंद्र सरकारनं घेतला, असं शरद पवार म्हणाले.
    सना खान हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मध्य प्रदेशमध्ये नर्मदेच्या काठावर सापडलेला मृतदेह कोणाचा?
    मणिपूरला जे काय घडलं त्याबाबत भूमिका संसदेत मांडली. ईशान्य भारत देशाच्या भवितव्याबाबत संवेदनशील आहे. बाजूला चीनची सीमा आहे, त्यामुळं अधिक काळजी घेण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले. ईशान्य भारतात ज्या गोष्टी घडत आहेत त्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं घातक आहेत. मणिपूरची स्थिती चिंताजनक आहे. आमची मागणी होती मणिपूर देशाचं एक राज्य असल्यानं त्यांनी तिथं जावं, अशी आमची भूमिका होती. पण, नरेंद्र मोदी निवडणुकीसंदर्भातील सभा घेण्याला प्राधान्य देत होते. या सर्व मुद्यांवर राष्ट्रीय जनमत निर्माण करण्याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.
    पवारांचा एकेकाळचा गड, आता काँग्रेसचा डोळा; पृथ्वीराजबाबा माढा मतदारसंघासाठी आक्रमक
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात मणिपूरच्या प्रश्नाबाबत, ईशान्य भारताच्या प्रश्नासंदर्भात बोलणं गरजेचं होतं. पण, नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन घेतलं असावं असं दिसतं. ते मी पुन्हा येईन असं म्हणत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्या पदावर ते आले नाहीत, असं शरद पवार म्हणाले. विरोधकांना त्रास देणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना लोकशाही मार्गानं धडा शिकवू, असं शरद पवार म्हणाले.

    राष्ट्रवादी हे कुटुंब, शरद पवारांनी सरकारसोबत यावं म्हणून भेटून साकडं घातलं,अजित पवार गटातील मंत्र्याची माहिती

    अजित पवार माझा पुतण्या, भेटायला आले यात कसली चर्चा शरद पवारांनी विषयच संपवला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed