रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर निवळी घाटात सातत्याने गॅस टँकरचे होत असलेले अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात अपघातांचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा निवळी घाटातील एका अवघड वळणावर LPG गॅस टँकरने कारला धडक दिल्यानंतर टँकर थेट दरीत कोसळला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून, कारमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच टँकर चालक देखील बचावला असून तो घटनास्थळावरून फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. दरम्यान कंटेनर ड्राइवरने बाजूला उडी मारून दुसऱ्या एका कंटेनरमध्ये बसून गेला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, हवालदार घाग, हवालदार, अंब्रे, हवालदार मुरकर, हवालदार संसारे, हलालदार शिंदे घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी देखील दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी अग्निशमक दलाचे ७ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला आहे. दरम्यान कंटेनर ड्राइवरने बाजूला उडी मारून दुसऱ्या एका कंटेनरमध्ये बसून गेला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, हवालदार घाग, हवालदार, अंब्रे, हवालदार मुरकर, हवालदार संसारे, हलालदार शिंदे घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी देखील दाखल झाले. सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी अग्निशमक दलाचे ७ कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
तालुक्यातील जयगड येथून हा टँकर गॅस भरून नाशिकला जात होता. परंतु निवळी घाटात अचानक टँकरचा ब्रेक निकामी झाला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. टँकरने एका कारला धडक देत टँकर थेट ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळला. दरम्यान गॅस टँकर लिकेज होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने एमआयडीसी येथील ७ कर्मचारी दाखल झाले आहेत. चालकाने गाडीतून उडी टाकत आपला प्राण वाचवल्याचे बोलले जात आहे. मात्र तो घटनास्थळावरून फरार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात टँकरने धडक दिलेल्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणारे गॅस टँकरच्या अपघाताची दखल ही जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतली असून गॅस टँकरच्या वाहतुकीबाबत प्रशासन भविष्यात वेगळा निर्णय घेण्याच्या विचारात आहे.