• Sat. Sep 21st, 2024

भय इथले संपत नाही! गावात ना लाईट ना शाळा; अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची गावकऱ्यांवर वेळ

भय इथले संपत नाही! गावात ना लाईट ना शाळा; अळ्यायुक्त दूषित पाणी पिण्याची गावकऱ्यांवर वेळ

चंद्रपूर: आपला महाराष्ट्र विकासाच्या उंच उंच भरारी घेत असल्याचे दावे नेते करीत असतात. विकासाची गगनभेदी उडान घेतलेल्या याच महाराष्ट्रात बघताच क्षणी ओकारी यावी असं अळ्याची गर्दी असलेलं पाणी पिण्याची दुर्दैवी वेळ एका गावावर ओढावली आहे. याकडे ना लोकप्रतिनिधी, ना प्रशासनाचे अद्याप लक्ष गेलं. आदिम समुदायाची असली तरी ती माणसे आहेत, याचा विसर सरकारला पडला का? हृदयाच्या ठिकाणी रस्त्यावरील माती भरून विकासाच्या गप्पा करणाऱ्या सरकारची नजर कोलाम बांधवांच्या दुःखाकडे आता तरी जाईल काय? हा खरा प्रश्न आहे.
कष्टाने कसली जमीन; मात्र दुसऱ्यानेच परस्पर काढला पीकविमा, आता हक्कासाठी जोडप्याची पायपीठ
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटचा टोकावर असलेल्या जीवती तालुक्यातील रायपूर (खडकी) हे आदिम कोलाम समुदायचे गाव. गावाची ग्रामपंचायत तीन किमी लांब. गावाची लोकसंख्या जेमतेम १५० आहे. स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटली मात्र गावाच्या चेहरा भक्कास अन उजाडच. पेसा क्षेत्रातील गट ग्रामपंचायत खडकी (रायपुर) अंतर्गत रायपुर गावाचा समावेश आहे. गावात समस्यांची गर्दी झालेली आहे. इथे खरी समस्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची आहे. पाणी आणण्यासाठी गावकरी दीड कि.मी डोंगरात उतरून नाल्याचे पाणी आणतात. ग्रामपंचायतने डोंगराखाली नाल्यात असलेल्या विहिरीवर दोन वर्षापूर्वी सोलर बसवले होते. सोलरमुळे गावात पिण्याचे पाणी येते. मात्र जिथून हे पाणी येते त्या विहिरीतील पाण्यात अळ्या पडल्या आहेत.

कोपरगावहून कल्याणसाठी स्पीड पोस्टने पार्सल निघालं, बॉक्स हाती येताच पोस्टाच्या कारभारावर नाराजी व्यक्त!

मागील दोन वर्षापासून या विहिरीत निर्जंतुकीकरणासाठी साधे ब्लिचिंग पावडरही टाकण्यात आलेले नाही. ही विहीर तुटलेल्या अवस्थेत आहे. विहिरीला कटगर नाही. सध्या या विहिरीत आंब्याचे झाड पडलेले आहे. पावसात सोलर चालत नाही. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी डोंगर चढ-उतार करावे लागते. रायपुर (खडकी) हे आदिम कोलाम समुदायाचे गाव आहे. या गावात एकही उच्चशिक्षित नाही. गावातील शाळा बंद आहे. अंगणवाडी आहे पण स्वतंत्र इमारत नाही. लाईट आहे पण फार राहत नाही. नक्षलग्रस्त भागात हा परिसर असल्याने मागच्या वर्षी सार्वजनिक सोलर वनविभागाने दिला. त्यावर केवळ रात्री गावात थोडाफार उजेड राहावा म्हणून बल्बचा वापर होतो. साधे मोबाईलची चार्जिंग करायला तालुक्याच्या ठिकाणी किंवा नगराळा जावे लागते. गावात पावसाचे पाणी साचलेले असते. मुलभूत सोई-सुविधापासून गाव वंचित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed