• Sat. Sep 21st, 2024

जखमा भरू लागल्या, इर्शाळवाडी बोलू लागली, बागडू लागली, मुलांनी खेळातून दिला जगण्याचा संदेश

जखमा भरू लागल्या, इर्शाळवाडी बोलू लागली, बागडू लागली, मुलांनी खेळातून दिला जगण्याचा संदेश

खालापूर : रायगड जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक बालकंही आई-वडिलांना पोरकी झाली. या मोठ्या धक्क्यानंतर या चिमुकल्यांची तसेच युवकांची मानसिक स्थिती सावरणं हे फार महत्त्वाचं काम होतं. शासनाने जलदगतीने पाऊल उचलत त्यांना तातडीने निवारा व सगळ्या व्यवस्था उपलब्ध करून देत तात्पुरती राहण्याची व्यवस्था करून दिली आहे. ही घटना घडल्यानंतर काही दिवस ही चिमुकली मुलं खूपच तणावात व अवघडलेल्या स्थितीत होती. मात्र आता तणाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. सामायिकपणे खेळण्याचं वय असलेल्या या मुलांचे पाय आता खेळाकडे वळू लागले आहेत. इतकेच नाही तर आता बहुतांश मुलं ही आपल्या मूळ आश्रमशाळेतील ठिकाणी गेले आहेत. तर काहीजण जायच्या तयारीत आहेत.

या मोठ्या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर जवळपास ३५ मुलांवर मोठं संकट उभं राहिलं होतं. पण त्याला नातेवाईक, प्रशासन सामाजिक संस्था यांनी आधार दिला. इतकेच नव्हे तर विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम ताई गोरे यांनी खुद्द त्या ठिकाणी भेट घेऊन त्या मुलांना विश्वास दिला.

संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे, ठाण्यात जितेंद्र आव्हाड आक्रमक
त्यामुळे गेले काही दिवस वाडीत या मुलांचे खेळणे बागडणे ऐकू येत नसल्याने मोठा गंभीर प्रसंग होता. लहान असलेल्या या मुलांचे वय हे खेळण्याबागडण्याचं आहे. मात्र ही मुलं यातून बाहेर पडावी, त्यांना मानसिक आधार द्यावा यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमातून या मुलांची सगळी जबाबदारी घेतली आहे.

धक्कादायक! दारूच्या नशेत तो बहिणीला मारायला गेला, धाकटा भाऊ आणि जावयाने उचलले टोकाचे पाऊल
या दुर्घटनेनंतर जवळपास ४३ कुटुंबांचं स्थलांतर करून चौक येथे सगळी व्यवस्था करून त्यांच्यासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. या सगळ्या कुटुंबांची व्यवस्था एकत्रित केल्याने तेथे एक छोटी कॉलनीच उभी राहिली आहे. आता या सगळ्यावर स्थानिक प्रशासन तसेच तालुका प्रशासन जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे व त्यांना कोणत्याही मूलभूत आवश्यक व्यवस्थेची कमी होऊ नये याकडेही लक्ष देत आहेत.

Sambhaji Bhide: गुन्हा दाखल होऊनही संभाजी भिडेंनी पुन्हा तेच केले, गांधीजींचा पुन्हा अवमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed