• Fri. Mar 20th, 2026

    धारदार शस्त्राने वार करत तरूणाचा खून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, परिसरात तणावपूर्ण शांतता

    धारदार शस्त्राने वार करत तरूणाचा खून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, परिसरात तणावपूर्ण शांतता

    जालना : भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून जालना शहरात तरुणाचा खून करण्यात आला आहे. शहरातील फुकटपुरा भागातील भवानी नगर रोडवर ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. भंगार खरेदी-विक्रीचा किरकोळ वाद भडकला आणि त्यातूनच हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र पोलीस तपासातच खुनाचे नेमकं कारण समोर येणार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, २७ वर्षीय आजात सिंग ईश्वर सिंग तिलपित्या (रा. गुरूगोविंदसिंग नगर) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच कदिम जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाद अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांकडून घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

    आमदार, मंत्र्यांनी अविश्वास दाखवल्याने महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांची मने दुखावली, १० वर्षांनंतरही उपेक्षाच

    दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तरुणास शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *