• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Crime: पुण्यातील आरोपीने मुंबईच्या जेलमध्ये स्वत:ला संपवलं; नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई : धमकी, घातक हत्यारांनी दुखापत केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दीपक शिवाजी जाधव (२८) या आरोपीने शुक्रवारी सकाळी पोलीस कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. हत्येच्या गुन्ह्यात दीपक पुण्याच्या येरवडा तुरुंगात होता. बोरिवली पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. दरम्यान या घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.

मूळचा पुणे येथील रहिवासी असलेला दीपक जाधव हा बोरिवलीत रिक्षा चालवायचा. त्याने एका प्रवाशाला मारहाण केली. प्रवाशाच्या तक्रारीवरून बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच दीपक पसार झाला होता. बोरिवली पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो काही सापडत नव्हता. कसून शोध घेतला असता तो येरवडा तुरुंगात असल्याचे समजले.

राष्ट्रवादी फुटीचं कारण ते ज्योतिरादित्य शिंदेंचे भविष्य; भाजप नेत्याचा दिल्लीत गौप्यस्फोट
२०१७मध्ये दीपक याने पत्नीची हत्या केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर दीपक खटल्याच्या सुनावणीला हजर राहत नव्हता. त्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरोधात वॉरंट काढले होते. त्याला पुणे पोलिसांनी अटक करून येरवडा तुरुंगामध्ये ठेवले होते. बोरिवली पोलिसांनी आपल्याकडील गुन्ह्यात त्याचा रीतसर ताबा घेऊन मुंबईत आणले होते.

बोरिवली पोलिसांनी बुधवारी दीपकला मुंबईतील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. बोरिवली पोलिसांनी त्याची चौकशी करून याच ठिकाणी असलेल्या लॉकअपमध्ये ठेवले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास कोठडीच्या दरवाजाच्या खिळ्याला दीपक याने जाडसर दोऱ्याने गळफास लावून घेतल्याचे बंदोबस्तावरील पोलिसांनी पाहिले. बेशुद्धावस्थेत असलेल्या दीपकला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Weather Forecast: जुलैमध्ये महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस कधीपर्यंत बरसणार? पुढील ४ दिवस अशी असेल राज्यातील स्थिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed