• Sat. Sep 21st, 2024
IAS अधिकाऱ्याशी बंध जुळले, बदलीमुळे कर्मचारी भावूक, फुलं उधळत निरोप, व्हिडिओ समोर

पालघर : कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात नातं घट्ट होताना अनेक वेळा पाहायला मिळतं. कर्मचाऱ्यांचा अधिकाधिक वेळ अधिकाऱ्यांच्या सहवासात जात असतो. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो. आयएएस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत झालेल्या बंधाविषयी असंच एक उदाहरण समोर आलं आहे.

शिक्षकांच्या बदलीनंतर रडणारे विद्यार्थी, सहशिक्षक, गावकरी आपण पाहिले आहेत. आता सनदी अधिकाऱ्याच्या बदलीवेळी भावूक झालेले कर्मचारी पहायला मिळत आहेत.

पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह यांची नुकतीच बदली झाली. २१ जुलै रोजी झालेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये त्यांचाही समावेश होता. आयुषी यांची नियुक्ती आता गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.

एकत्र जेवण ठरलं अखेरचं, जीवलग मित्र भरधाव ट्रिपल सीट निघाले, गाडीला धडकून दोघांचा मृत्यू

बदली झाल्यानंतर नुकतंच कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आयुषी सिंह यांना निरोप दिला. यावेळी फुलांचा वर्षाव करत त्यांना सेंड ऑफ देण्यात आला. कर्मचाऱ्यांचं प्रेम पाहून आयुषी सिंह यांनाही अश्रू अनावर झाले. यासोबतच सर्व कर्मचारी गहिवरल्याचे दिसून आले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोण आहेत आयुषी सिंह?

आयुषी सिंह या २०१९ च्या बॅचच्या सनदी अधिकारी आहेत. त्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) प्रकल्प अधिकारी यासह सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांची नियुक्ती गडचिरोली जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली आहे.

रस्ता अडवला, शाळा दणाणून सोडली; लाडक्या शिक्षकाची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचं भर पावसात आंदोलन

दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्रातील विविध नक्षलवादी-आदिवासी बहुल भागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली आणि नियुक्ती आदेश २०२१ मध्ये देण्यात आले होते. त्यानुसार आयुषी सिंह यांची पालघरमध्ये नियुक्ती करण्यात आली होती.

सगळं ठीक आहे ना? २१ वर्षीय नर्सचा कुटुंबासोबत व्हिडिओ कॉल, ऑन ड्युटीच आयुष्य संपवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed