• Fri. Mar 6th, 2026

    पुण्याच्या व्यापाऱ्यानं विश्वास ठेवला अन् घात, दोघांकडून ४६ लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

    पुण्याच्या व्यापाऱ्यानं विश्वास ठेवला अन् घात, दोघांकडून ४६ लाखांची फसवणूक, नेमकं काय घडलं?

    पुणे : एका व्यापाऱ्याला त्याचा कांदा परदेशात विकून मोठा नफा कमवून देण्याचं खोटं आमिष दाखवण्यात आलं. व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींचा आज पुणे सत्र न्यायालयाने जमानी अर्ज फेटाळला आहे. परदेशात कांदा विकण्याच्या बहाण्याने मार्केटयार्ड येथील व्यावसायिकाची ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातल्या मार्केट येथे २०२१ साली घडला होता. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांनी अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात केला होता मात्र तो फेटाळणायत आलं आहे. सत्र न्यायाधीश आर.आर.मेंढे यांनी हा आदेश दिला. सिद्धप्पा ए. एल. एस. भंडारी आणि गजेंद्र सिद्धाप्पा (रा. कर्नाटक) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

    याबाबत मार्केटयार्ड परिसरातील कांदा व्यापारी स्वप्नील भगवान बेल्हेकर (वय ३१, रा.दत्तनगर,नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २०२१ मध्ये हा प्रकार घडला आहे.

    या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी आहे की, व्यवसायानिमित्त बेल्हेकर यांची सिद्धाप्पा भंडारी आणि गजेंद्र सिद्धाप्पा यांच्याशी ओळख झाली होती. आम्ही कांद्याचे मोठे व्यापारी आहोत आणि तुमचा माल परदेशात विकून मोठा नफा करून देतो, असे या दोघांनी बेल्हेकर यांना सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.
    विराट कोहलीने शतकानंतर केली एक खास गोष्ट, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं केलं तरी काय…
    व्यवसायाच्या नावाखाली दोघांनी मिळून बेल्हेकर यांच्याकडून ४६ लाख रुपयांचा माल घेतला. कांद्याचे पैसे मागितल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना धमकावण्यास सुरवात केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सिद्धप्पा भंडारी याने अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जास सरकारी वकील मकरंद औरंगाबादकर यांनी विरोध केला. फिर्यादी यांच्यावतीने ॲड. शिवम पोतदार यांनी कामकाज पाहिले.
    मोठी बातमी: राज्यातील ४१ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तुकाराम मुंढेंची दीड महिन्यात पुन्हा बदली, संपूर्ण यादी

    व्यापाऱ्याला न्याय कधी मिळणार ?

    पुण्यातील व्यापाऱ्याचे तब्बल ४६ लाखांची फसवणूक झाली आहे. कर्नाटक राज्यातील दोघांनी त्यांची फसवणूक केली आहे. आरोपी जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांसमोर हजर होणार की वरच्या न्यायालयात दाद मागणार हे पाहावं लागेल. दरम्यान, या फसवणुकीच्या घटनेनं व्यापाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करताना सतर्कता बाळगणं आवश्यक आहे हे अधोरेखित झालं आहे.
    सेमीफायनलमध्ये बांगलादेशचा सुपडा साफ, आता पाकिस्तानचा नंबर; रविवारी होणार IND vs PAK हाय व्होल्टेज फायनल मॅच

    माळशेज घाटात इनोव्हा – नॅनो कारची धडक; इनोव्हा ओढ्यात कोसळली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed