एकेकाळी गेवराईत पंडितांचं निर्विवाद वर्चस्व होतं. आजही शिवाजीराव पंडितांच्या पुढच्या पिढीचा शब्द चालतो.
> १९७८ पासून १९९५ पर्यंत शिवाजीराव पंडित गेवराईचे आमदार राहिले
> मात्र, १९९५ ला चुलत बंधू बदामराव पंडितांनीच शिवाजीराव पंडितांना आव्हान दिलं
> १९९५ आणि १९९९ ला अपक्ष मैदानात उतरत भाजपच्या पाठिंब्यावर विजयी
भाजपचा पाठिंबा घेऊन बदामराव पंडीत आमदार झाल्यावर अमरसिंह पंडितांनी थेट भाजपात प्रवेश करून राजकारणात यश मिळवलं
> वडीलांचा वरसा घेऊन अमरसिंह पंडित राजकारणात
> ९० च्या दशकात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात सक्रीय
> २००४ ला भाजपकडून विधानसभेच्या मैदानात
> काकांना धूळ चाळत आमदारकी मिळवली
> मात्र, २००९ ला राष्ट्रवादीकडून लढलेले बदामराव पंडित वरचढ ठरले
> २०१२ ला अमरसिंह पंडितांची घरवापसी
> २०१४ ला राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या मैदानात, पण पराभव
अमरसिंह पंडितांनी राष्ट्रवादीत वापसी करताच भाजपने दोन पंडितांना भाजपने पर्याय म्हणून भाजपने लक्ष्मण पवारांना बळ दिलं.
>लक्ष्मण पवार हे काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पवारांचे चिरंजीव
>२०१३ ला भाजपात प्रवेश
>२०१४ ला भाजपकडून उमेदवारी आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी
>२०१९ ला अमरसिंह पंडिताचं बंधू विजयसिंह पंडीतांचा पराभव करत पुन्हा आमदार
१९७८ ते २०१४ जवळपास चार दशकं गेवराईचा आमदार पंडित घरातलाच राहिला. पण लक्ष्मण पवारांनी आमदारकी खेचून आणत दोन्ही पंडितांना गारद केलं. मात्र, आता अजितदादांच्या बंडाने गेवराईतली राजकीय समीकरणं बदललीत. अमरसिह पंडितांनी अजितदादांचं पारडं जडं केल्याने लक्ष्मण पवारांची कोंडी झालीय. २०२४ च्या उमेदवारीवरून संभ्रम वाढलाय.