• Sat. Sep 21st, 2024

महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह कोणत्या जिल्ह्यात? विवाह नोंदणींची आकडेवारी काय सांगते..

महाराष्ट्रात सर्वाधिक आंतरजातीय विवाह कोणत्या जिल्ह्यात? विवाह नोंदणींची आकडेवारी काय सांगते..

तुषार धारकर, नागपूर : सामाजिक समता प्रस्थापित व्हावे यासाठी आंतरजातीय विवाह मोलाची भूमिका निभावतो. या कार्यात नागपूर विभाग राज्यात सर्वात पुढे आहे. समाज कल्याण विभागातील नोंदणीनुसार नागपूर विभागात मागील वर्षात १ हजार ३०४ आंतरजातीय विवाहाची नोंदणी झाली असून राज्यातील प्रत्येक चौथे लग्न नागपुरात करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाच्यावतीने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते. याअंतर्गत राज्यात होणाऱ्या नोंदणीकृत आंतरजातीय विवाहाची आकडेवारी समाज कल्याण विभागाने जाहीर केली आहे. मागील एका वर्षात राज्यात एकूण ५ हजार ४६० आंतरजातीय विवाहाची नोंदणी झाली. यापैकी सर्वाधिक २४ टक्के म्हणजेच १ हजार ३०४ विवाह नागपूर विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये झाले. या जोडप्यांना ५० हजार प्रती जोडपे म्हणून विभागात ६ कोटी ५२ लाखाचा निधी वितरित करण्यात आला. नागपूरनंतर नाशिक आणि पुणे विभागात हजारांच्यावर आंतरजातीय विवाहाची नोंद झाली. राज्यातील सर्वात कमी १२८ आंतरजातीय विवाहांची नोंद औरंगाबाद विभागात झाली आहे. यासाठी विभागाच्यावतीने ६४ लाख ५० हजारांचा निधी खर्च केला गेला आहे. समाज कल्याण विभागाच्यावतीने आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याच्या नावे संयुक्त खात्यात अर्थसहाय्य केले जाते. यासाठी दोघांपैकी एक व्यक्ती अनुसुचित जाती, जमाती, विमुक्त जाती तर दुसरा व्यक्ती सवर्ण हिंदू, लिंगायत जैन किंवा शिख या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. समाज कल्याण विभागाच्यावतीने राज्यात एकूण २७ कोटी ३१ लाख ७६ हजार रुपयांचा निधी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना दिला आहे.
लग्न झालेल्या या जोडप्यांना सरकार देणार ५० हजार रुपये; कुणाला मिळणार लाभ? जाणून घ्या…
आकडेवारी
विभाग : आंतरजातीय विवाह

नागपूर : १ हजार ३०४
नाशिक : १ हजार १५८
पुणे : १ हजार ६६
मुंबई : ८७९
अमरावती : ७७२
लातूर : १५२
औरंगाबाद : १२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed