• Sat. Mar 14th, 2026

    राजकारणात भूकंप नसून शरद पवारांची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीमध्ये २३ वर्षे राहिलेल्या नेत्याचा दावा

    राजकारणात भूकंप नसून शरद पवारांची स्क्रिप्ट, राष्ट्रवादीमध्ये २३ वर्षे राहिलेल्या नेत्याचा दावा

    छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार महाविकास आघाडीतून भाजपसोबत गेले आहे. हे अचानक घडलेलं नाही हे सर्व ठरवून घडलेले आहे. हे सर्व काही स्क्रिप्टेड आहे. ही सगळी राजकीय ऍडजस्टमेंट आहे. मी पक्षात होतो. पवार घराण्याची माझे चांगले संबंध होते. त्यामुळे हे मला माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शकुनी मामाची भूमिका आहे, असा घणाघाती आरोप बीआरएस पक्षाचे नेते कदीर मौलाना यांनी केला आहे.
    राज्यात पुन्हा मोठा धमाका होणार, लवकरच आणखी एका मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी?
    राज्याच्या राजकारणामध्ये काल मोठा भूकंप झाला. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत भाजप आणि शिवसेने (शिंदे गट) सोबत घरोबा केला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २३ वर्षे काम केलेल्या कदीर मौलाना यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत.
    अजितदादांच्या शपथविधीनंतर अमोल कोल्हेंची मोठी घोषणा, म्हणाले माझा आतला आवाज सांगतोय…
    एक दिवसापूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये भूकंप झाला. मात्र हा भूकंप नसून पवार घराण्याने घडवून आणलेले हे कट कारस्थान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा राष्ट्रवादीने केल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे यांना तुरुंगात जाण्याची भीती होती. म्हणून हे सगळं ठरवून झाले आहे, असा दावा कदीर मौलाना यांनी केला आहे.

    अजितदादा राज्याचे नवे उपमुख्यमंत्री; बारामतीत जोरदार घोषणाबाजी अन् फटाक्यांची आतषबाजी

    पवार घराण्यामध्ये याबद्दल अगोदर स्क्रिप्ट तयार झाली होती. मी राष्ट्रवादीमध्ये आधीपासून होतो. मला हे सगळं माहीत होतं. राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार होती म्हणून मी राष्ट्रवादी सोडली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे काही नेते बीआरएस पक्ष भाजपची बी टीम आहे, असं म्हणत होते. तेच आता भाजपच्या सोबत जाऊन बसले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

    भाजप ईडी आणि इन्कम टॅक्सच्या माध्यमातून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेच्या बळाने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे जनतेने याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. बेरोजगारी वाढली आहे आणि महागाईही वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे सगळे कटकारस्थान रचत असल्याचा आरोप कदीर मौलाना यांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed