• Fri. Mar 13th, 2026
    अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार चाप; दंड न भरल्यास मालमत्ता करणार जप्त

    Jalgaon News: शहरामध्ये अवैध प्रकारे होणारी वाळूची वाहतूक वाढली आहे. महसूल पथकाकडून कारवाई होऊनसुद्धा दंड वसूल होत नाही,म्हणून जिल्हा प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेतला आहे.

     

    अवैध वाळू वाहतुकीला जळगावात बसणार चाप; दंड न भरल्यास मालमत्ता करणार जप्त
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाची मालमत्ताच आता जप्त करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मित्तल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की काही दिवसांपासून वाळूच्या अवैध वाहतूकप्रकरणी महसूलच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईत वाहन जप्त केले जाते. मात्र, या वाहनांना आकारण्यात येणार दंड भरला जात नाही. त्यामुळे अशी वाहने जप्तीच्या ठिकाणी पडून राहतात; पण दंड वसूल होत नाही. आता त्यावरही प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाळूचे वाहन जप्त केल्यानंतर दंड न भरल्यास संबंधित वाहनमालकाला मालमत्ता जप्तीची नोटीस दिली जाईल. या नोटिस नंतरही त्याने दंड भरला नाही तर त्याच्या मालमत्तेवर बोजे बसवून ती शासनजमा केली जाईल, असे जिल्हाधिकारी मित्तल यांनी सांगितले.

    खराब रस्त्याच्या झळा अधिकाऱ्यांना कळल्या पाहिजेत, ग्रामस्थांकडून अभियंत्याची बैलगाडीतून वरात, नेमकं काय घडलं?
    रावेर येथील मोहन बोरसे नामक वाहनमालकाला अशाच आशयाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्याने दंड न भरल्याने त्याच्या मालमत्तांवर बोजे बसविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. रावेर येथील कारवाई यशस्वी झाल्यास जिल्हाभरात याच निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही मित्तल यांनी सांगितले.

    जवळच्या शहरातील बातम्या

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed