• Tue. Jun 16th, 2026

    Shivrajyabhishek Accident : राजांच्या शिवराज्यभिषेकाला उपस्थित, कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी परतताना साताऱ्याच्या तरुणासोबत अनर्थ; शिवभक्तांमध्ये शोककळा

    Shivrajyabhishek Accident : राजांच्या शिवराज्यभिषेकाला उपस्थित, कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी परतताना साताऱ्याच्या तरुणासोबत अनर्थ; शिवभक्तांमध्ये शोककळा

    Raigad Shivrajyabhishek Accidental Death a Youth : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच काल रायगड येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्यभिषेक झाल्यानंतर एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला.

    शिवराज्यभिषेक सोहळा तरुणाचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड : किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो शिवप्रेमी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहतात. मात्र, दरवर्षी सोहळ्यानंतर किंवा सोहळ्यादरम्यान घडणाऱ्या दुर्घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा पुन्हा ऐरणीवर येत आहे. यंदाच्या 353वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर सातारा जिल्ह्यातील एका शिवभक्ताचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून, गेल्या काही वर्षांतील दुर्घटनांची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.

    नेमका कसा झाला अपघात?

    सातारा जिल्ह्यातील केंजळेवाडी (किंजळे) येथील कपिल केंजळे हा शिवभक्त शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर आला होता. सोहळा आटोपून पोलादपूर मार्गे आपल्या गावी परतत असताना त्याच्या वाहनाचा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या कपिलला पोलादपूर पोलिसांनी तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. तसेच रायगडावरून परतणाऱ्या आणखी दोन शिवभक्तांच्या मोटारसायकलीचा अपघात होऊन ते जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar News: नुकतीच दहावी पास झालेली तीन मुलं साई टेकडी तलावात बुडाली, काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेनं छत्रपती संभाजीनगर सुन्न!
    यापूर्वीही शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर गंभीर अपघातांच्या घटना घडल्या आहेत. ६ जून २०२५ रोजी झालेल्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या शिवप्रेमींना घेऊन जाणारी जीप माणगाव तालुक्यातील बोरवाडी गावाजवळ उलटली होती. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात अनेक शिवभक्त गंभीर जखमी झाले होते. सर्व जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते.

    याआधीही अशा घटना घडलेल्या

    तसेच जून 2023 मध्ये 349व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर येथील 19 वर्षीय ओमकार दीपक भिसे हा शिवभक्त रायगडाच्या पायऱ्या चढत असताना अचानक चक्कर येऊन कोसळला आणि हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 4 जून 2023 रोजी पुणे येथील प्रशांत गुंड (वय 28) या शिवभक्ताचाही गडावर असताना मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांची प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती.
    Maharashtra TimesRevas-Reddi Coastal Highway: खाडीवर उभा राहतोय कोकणचा ‘गेमचेंजर’ पूल; रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे वाहतूक वेगवान होणार
    याशिवाय एका शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान रायगडाच्या महादरवाजाजवळ अचानक दरड कोसळून एका शिवभक्ताचा जागीच मृत्यू झाल्याची गंभीर दुर्घटनाही घडली होती. या घटनेनंतर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या. दरवर्षी सोहळ्यापूर्वी कड्यांवरील सैल आणि धोकादायक दगड हटविण्याची मोहीम राबविण्यात येते. दरवर्षी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होत असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, वाहतूक नियंत्रण आणि परतीच्या प्रवासातील सुरक्षितता याकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. यंदाच्या दुर्घटनेनंतर शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी आणखी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा