• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Hostel Murder : मजल्यावर मुलगी एकटीच का? पीडितेच्या आईशी भेट, मिटकरी आक्रमक

मुंबई: मरीन ड्राइव्ह परिसरातील सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील २० वर्षीय मुलीचा खुन केल्याची घटना उघडकीस आली होती. मुलीचा मृतदेह विवस्त्रावस्थेत आढळून आल्याने अतिप्रसंगाचा संशय व्यक्त करण्यात येत होता . या घटनेनंतर वसतीगृहाचा सुरक्षारक्षक गायब असल्याने त्याच्यावर मुलीच्या खूनाचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, चर्नी रोड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे ट्रॅकवर त्याचा मृतदेह मिळाल्याने या प्रकरणातील गूढ वाढले होते. पोलिसांच्या तपासणीनंतर तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.Crime: ट्रेनचं तिकीटही काढलं होतं, पण घरी जायची इच्छा अधुरीच, मुंबईच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची वॉचमनकडून हत्या
या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. माझ्या मुलीला एकटीलाच वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर का ठेवण्यात आले होते असा सवाल त्यांनी विचारला होता. तसेच जो पर्यंत वसतिगृहातील महिला अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मुळीच मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शासकीय वसतिगृहातच खुनाची घटना घडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. महिला व बालविकासमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी वसतिगृहाला भेट दिली.

जर कोणाला वाचविण्याचा प्रयत्न केला तर महागात पडेल:

विरोधकांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पीडितेच्या आई वडिलांची भेट घेतली असून, या भेटीनंतर त्यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली आहे. ” जर राज्यातील शासकीय वसतिगृहातच मुली सुरक्षित नसतील तर राज्यतील शासन, प्रशासन नेमकं काय करतेय. तसेच मंत्री विस्ताराच्या नादाला लागलेले हे सरकार शासकीय वसतिगृहातच मुली सुरक्षित नसतील तर या निमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Mumbai Crime : मुंबईत तरुणीची हत्या; एकुलती एक मुलगी होती, पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावर, महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
मी पीडित मुलीच्या आई वडिलांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणे आहे की, मुलीने मला वसतिगृहाच्या चौथ्या माळ्यावर राहायचे नाही अशी वारंवार विनंती वसतिगृहाच्या वार्डनना केली होती. इथला सुरक्षारक्षक मला वारंवार त्रास देतोय अशी तक्रार देखील मुलीने केली होती. मात्र, आमच्या मुलीच्या कुठल्याही विनंतीची दखल शासकीय वसतिगृहात घेतली गेली नाही. त्यामुळेच आमच्या मुलीचा जीव गेला आहे, असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांचा असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

या वसतिगृहाच्या वॉर्डन जे कोणी असतील, ज्यांना सरकारने पाठीशी घातलं आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी मिटकरींनी केली. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, तसेच आरोपीला कठोर शासन झाले पाहिजे या साठी आम्ही सर्वजण आवाज उठवणार आहोत. याबरोबरच आगामी अधिवेशनात याचे भक्कम मोठे परिणाम दिसून येतील, असे म्हणत मिटकरींनी सरकारला इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed