• Sat. Sep 21st, 2024
आईला संपवलं, बॉडीजवळ मेसेज लिहिला; तिला कंटाळलेलो, स्माईलीमुळे मुलाचा सहभाग झाला स्पष्ट

मुंबई : मुंबईतील पोलीस निरीक्षकाची पत्नी २३ मे २०१७ रोजी राहत्या घरात मृतावस्थेत आढळली होती. तिच्या बॉडीशेजारी रक्ताने लिहिलेला एक संदेश होता. “तिला कंटाळलो आहे, मला पकडा आणि फाशी द्या” अशा आशयाच्या इंग्रजी मेसेजखाली एक स्मायली इमोजी होती. या प्रकरणात महिलेच्या सख्ख्या मुलालाच अटक करण्यात आली आहे, सहा वर्षांनंतरही खटला कोर्टात सुरु आहे.

पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांची पत्नी दीपाली गणोरे यांची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. हत्येच्या शेजारी लिहिलेल्या मेसेजच्या स्वरुपामुळे ही हत्या मयत महिलेच्या ओळखीच्या व्यक्तीने केली असावी, असा अंदाज बांधण्यात आला. याशिवाय, घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश केल्याची कोणतीही चिन्हे आढळली नव्हती.

सुरुवातीला हत्येप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला असला तरी, या मेसेजमुळे पोलिसांचा दीपालीच्या जवळच्या व्यक्तींवर संशय बळावू लागला. गणोरे यांचा २० वर्षांचा मुलगा सिद्धांत हा हत्येच्या वेळेपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले. तसेच त्याचे कपडे आणि काही रोख रक्कमही घरातून गायब होती.

मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर
या प्रकरणात सिद्धांत हा संशयित क्रमांक एक झाला आणि त्याचा शोध सुरू झाला. कॉल डेटा रेकॉर्ड आणि इतर माहितीच्या आधारे, त्याला अवघ्या दोन दिवसात शोधण्यात आले. २५ मे २०१७ रोजी जोधपूर येथे शोधून काढण्यात आले आणि मुंबईत आणून अटक करण्यात आली.

पुण्यात तीन महिन्याच्या बाळाने अंगठी गिळली, नाजूक जठर फाटण्याची भीती, अखेर…
तपासादरम्यान, पोलिसांनी सांगितले की, अभ्यासावरून सिद्धांतचा त्याच्या आईशी नेहमीच वाद होत असे. दीपाली आणि ज्ञानेश्वर यांच्यात झालेल्या शेवटच्या फोन कॉलमध्ये तिने सिद्धांत घरी असल्याचे सांगितले होते.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

दीपाली सिद्धांतसोबत ‘शेवटची एकत्र’ दिसली होती, हे सिद्ध झाले. पोलिसांनी घरातील बाथरूममधून पँटची जोडही जप्त केली होती, त्यावर असलेले रक्त दीपाली यांचे असल्याचे सांगण्यात येत होते.

मधुचंद्राला बायकोचा नकार, नाशिकच्या नवरदेवाने खडसावतच म्हणाली, दोनदा लग्न झालंय, तुमचे…
अटकेनंतर, सिद्धांतने त्याच्या बचावात दावा केला की त्याचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. त्या आधारावर त्याने आपल्याला सोडण्याची मागणी केली. न्यायालयाने त्याला वैद्यकीय तज्ज्ञांकडे पाठवण्याचे निर्देश दिले. सरकारी जे जे रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या समितीने एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत आणि तो खटल्याला सामोरे जाण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed