• Fri. Mar 20th, 2026

    समृद्धीचा दुसरा टप्पा फक्त ८० किमीचा, पण यानेच आधीच्या ५२० किमीचं चित्र पालटणार

    ByMH LIVE NEWS

    May 26, 2023
    समृद्धीचा दुसरा टप्पा फक्त ८० किमीचा, पण यानेच आधीच्या ५२० किमीचं चित्र पालटणार


    शिर्डी : समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं उद्घाटन करुन शिर्डीपर्यंत हा रस्ता आणला खरा, पण तिथून पुढे ठाण्यापर्यंत येण्याचा वेग जैसे थेच राहिला आणि परिणामी वाहनधारकांना याचा फारसा फायदा झाला नाही. पण नागपूरहून निघालेल्या वाहनासाठी आता नाशिकला पोहोचणं वेगवान झालं आहे ते फक्त ८० किमीच्या रस्त्यामुळे. आधी ५२० किमी आणि आता ८० किमीचा जो समृद्धी महामार्ग खुला केला गेला त्यामुळे या रस्त्याचं रुप पालटलं आहे. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या ५२० किमीच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आता नाशिकमधील भरवीरपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed