• Wed. Sep 16th, 2026

हकालपट्टीच्या निर्णयावर आशीष देशमुखांचा प्रहार, नेतृत्वावरही पुन्हा केला हल्लाबोल

हकालपट्टीच्या निर्णयावर आशीष देशमुखांचा प्रहार, नेतृत्वावरही पुन्हा केला हल्लाबोल

नागपूर : ‘राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान होत असेल आणि संपूर्ण ओबीसी समाजाला दुखावले जात असेल तर काँग्रेसच्या भल्यासाठी राहुल गांधींनी भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ५४ टक्के असलेल्या ओबीसी समाजाची माफी मागावी आणि हे प्रकरण संपविण्यात यावे. ओबीसी समाज दुखावला गेल्यास मतांच्या बाबतीत काँग्रेसला त्याचे परिणाम भोगावे लागतील,’ असे बरोबर सुचवल्यामुळेच आपल्याला पक्षातून हाकलण्यात आल्याचा आरोप माजी आमदार आशीष देशमुख यांनी केला. त्यांनी आज हे निवेदन प्रसिद्ध केले.आशीष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. देशमुख म्हणाले की, ‘हकालपट्टीचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हाती असल्याचे या कृतीतून दिसून येते. ओबीसींच्या हितासाठी आवाज उठवल्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केली. त्यांनी मला कारणे दाखवा नोटीस दिली. मी सविस्तर उत्तर दिले. महाराष्ट्रासह देशभरातील माध्यमांनी माझे उत्तर तपशीलवार प्रसिद्ध केले. मात्र, माझे उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांसाठी समाधानकारक नाही, तेच कारण त्यांनी हकालपट्टीसाठी दाखवले आहे.

Ahmedabad Suicide Case: पतीच्या निधनानंतर सती जाण्यासाठी कुटुंबाकडून वारंवार छळ, नैराश्यातून महिलेने उचलले टोकाचे पाऊल
माझी पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला होता आणि नंतर नोटीसही देण्यात आली होती, यावरूनही याचा अंदाज लावता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेसचे योगदान आहे. लोकशाहीसाठी, भारताच्या एकात्मतेसाठी काँग्रेस नेत्यांनी बलिदान दिले. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना जे आवडत नाही, त्यांना ते काढून टाकतात, असे देशमुख म्हणाले.

White house : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हत्येचा प्रयत्न, भारतीय वंशाच्या तरुणाला अटक
महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेते जे स्वत:ला ओबीसी म्हणवतात ते अडचणीत आले कारण मी ओबीसींच्या प्रश्नांवर आवाज उठवत होतो. आशिष देशमुख यांची पक्षातील उंची वाढली तर त्यांचे वजन कमी होईल, असे या दुकानदार नेत्यांना वाटत होते. माझा गुन्हा काय हे त्यांनी अजून सांगितलेले नाही, असे देशमुख म्हणाले.

कौतुकास्पद! १० वर्षांच्या चिमुकलीने केली कमाल, बिबट्याच्या हल्लातून आजीचे वाचवले प्राण
राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी, असा सल्ला मी दिला. काँग्रेस जर लोकशाहीवादी पक्ष असेल तर ही सूचना लोकशाही आहे.महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना आपला पक्ष लोकशाहीवादी नसल्याचे सिद्ध करण्याची घाई झालेली दिसते, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed