• Sat. Sep 21st, 2024

जितेंद्र आव्हाड आणखी अडचणीत, करमुसे मारहाण प्रकरणात ५०० पानांचं चौथं आरोपपत्र दाखल

जितेंद्र आव्हाड आणखी अडचणीत, करमुसे मारहाण प्रकरणात ५०० पानांचं चौथं आरोपपत्र दाखल

ठाणे : मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अनंत करमुसे यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ५०० पानांचं आरोपपत्र दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे यांना तत्कालीन गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अंगरक्षक आणि कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. एप्रिल २०२० दरम्यान आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या आरोपावरून करमुसे यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी आव्हाड यांच्या विरोधात करमुसे यांनी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात ६ एप्रिल २०२० रोजी भादंवि कलम २९२, ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२१ ला आव्हाड यांना वर्तकनगर पोलिसांनी अटक देखील केली होती. या गुन्ह्यातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. या प्रकरणी आनंद करमुसे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायलयाने ठाणे पोलिसांना ९० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी ५०० पानांचं आरोपपत्र दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

करमुसे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचा सहकाऱ्यांचा बाबतीत ९० दिवसांत तपास करून पुन्हा अतिरिक्त चौथे आरोपपत्र ठाणे पोलिसांनी दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणी आव्हाड यांच्या कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यात १२० (ब) आणि ३६४ (अ) अशी कलम लावण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा खुलासा केलेला नसून सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन काब्दुल्ले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्यासोबत संपर्क होऊ शकला नाही.

ठाण्यातील ५३५ महिला अजूनही बेपत्ताच; मानवी तस्करीची भीती, रुपाली चाकणकरांच्या दाव्याने खळबळ
करमुसे प्रकरणातील घडामोडी

> अनंत करमुसे याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील मॉर्फ केलेले छायाचित्र सोशल मीडियावर टाकले

> एप्रिल २०२० मध्ये अभियंता करमुसेना राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मारहाण

> तत्कालीन गृहनिर्माणमंत्री डॉ. आव्हाड यांच्या अंगरक्षक वैभव कदम यांच्या नावाचा समावेश

> ५ एप्रिल, २०२० रोजी वर्तकनगरमध्ये गुन्हा दाखल

> आक्षेपार्ह पोस्ट-अभियंता अनंत करमुसे यांनाही समन्स पत्र बजावले

> वर्तकनगर पोलिसांची डॉ. आव्हाड याना अटकेस टाळाटाळ

> तब्बल दीड वर्षानंतर १४ आक्टोबर २०२१ ला डॉ. आव्हाड याना अटक आणि सुटका

> करमुसे मारहाण प्रकरणाची सीबीआय चौकशीची उच्च न्यायालयात मागणी

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात भाजपला डावलले; दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांतील विसंवादाचे चित्र उघड
> उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला

> करमुसे यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला

> ठाणे पोलिसांनी खोटे प्रतिज्ञा पत्र दाखल केल्याचा डॉ. आव्हाड यांचा दावा

> २४ फेब्रुवारी, २०२३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ९० दिवसात पुन्हा चौकशी करून आरोपपत्र दाखल निर्देश दिलें

> सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर डॉ.आव्हाड यांचा अंगरक्षक वैभव कदम लोकल ट्रेन खाली सापडल्याची घटना

> व्हाट्सअप स्टेटसमध्ये ‘मी आरोपी नाही’ तणावाखाली आत्महत्या केल्याची चर्चा

> सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने अखेर ठाणे पोलिसांनी सादर केले ५०० पानांचे आरोपपत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed