• Sat. Sep 21st, 2024
Thane Fire : हायटेन्शन वायरचा पत्र्याला स्पर्श, मुंबईत २ घरांमध्ये आगीचा भडका; २ लहान मुलांसह ४ जण जखमी

ठाणे : ठाण्याजवळील मुंब्र्यातील शिवाजीनगर भागात असणाऱ्या झगडे चाळीत आग लागल्याची सोमवारी दुपारच्या सुमारास घटना घडली आहे. चाळीतील दोन घरांना लागलेल्या आगीत एकूण ४ जण भाजले असून त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमध्ये एक पुरुष, एक महिला आणि २ लहान मुलांचाही समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्याचे प्रयत्न सुरू केले असून चाळीतील घरे खाली करण्यात आली आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणाहून चाळीच्यावरून जाणाऱ्या हायटेन्शन वायरचा स्पर्श झाल्याने सदर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातील मुंब्रा येथील शिवाजी नगर परिसरात असलेल्या तळ अधीक एक मजली झगडे चाळीत सोमवारी २२ मे रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाळीच्यावरून टाटा पॉवर हायटेन्शन केबल गेली आहे. या हायटेन्शन केबलचा चाळीच्या छताला स्पर्श झाल्याने चाळीतील पहिल्या मजल्यावरील घर क्रमांक १ आणि घर क्रमांक ४ या दोन घरांना अचानक आग लागली.

चुकीला माफी नाही! पोलिसाने केली अशी चूक, कैद्याने झाडूने बदडलं; बेदम मारहाणीचा VIDEO समोर

या आगीत होरपळून घरातील चार जणांना गंभीर दुखापत झाली आहे त्यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आलिमुद्दिन सय्यद (३५), सलमा सय्यद (३०), आलिना सय्यद (५), फातिमा सय्यद (४) असे या आगीत होरपळलेल्या जखमींची नावे आहेत. या आगीत चौघांच्याही चेहऱ्याला, छातीला, पाठीला भाजले आहे. हे चौघेही एकाच कुटुंबातील रहिवाशी असून घर क्रमांक १ मध्ये भाडे तत्वावर राहत होते. सदर आग लागलेल घर क्रमांक १ हे बादशाह नझरुद्दिन इस्लाम तर घर क्रमांक ४ हे फरिदा मुस्ताक कुरेशी यांच्या मालकीचे आहे. या जळालेल्या दोन्ही घरातील लाकडी कपाट, कपडे, स्वयंपाक घरातील शेगडी, भांडी, पलंग, कॉम्प्युटर इत्यादी साहित्य जळून खाक झाले आहेत.

पत्नीने केली तक्रार, पोलिसांनी अंत्यसंस्कार थांबवला; चितेवरून पतीची बॉडी उचलली अन्…
या घटनेची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त होताच त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. या घटनेत लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी टोरंट पॉवर विद्युत कर्मचारी, मुंब्रा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-फायर वाहनासह व ०१-रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर २ वाजण्याच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सदर घटनेत अग्निशमन दलाने आगीत अडकलेल्या चारही जखमींना सुखरूप बाहेर काडून त्यांना प्राथमिक उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून या चारही जखमींना पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालय, मुंबई येथे हलविण्यात आले आहे.

Weather Alert: राज्यावर पुढचे ३ दिवस अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्याला हवामान खात्याचा अलर्ट जारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed