• Sun. Sep 22nd, 2024
नाना पटोलेंनी राष्ट्रवादीला डिवचलं, माढा लोकसभा मतदारसंघाबाबत केलं मोठं वक्तव्य

सोलापूर : काँग्रेसच्या निर्धार महामेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले हे या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर बोलताना नाना पटोले यांनी सोलापूरसह माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार विजयी झाला पाहिजे असे म्हणत महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं आहे.लोकसभाच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत दोन्ही वेळा सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. आता सुशीलकुमार शिंदेंना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी घ्या, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं. फक्त सोलापूर नाही तर माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आला पाहिजे, असंही नाना पटोले म्हणाले. एकीकडे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे निवृत्तीची घोषणा करतात तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुशीलकुमार शिंदेंसाठी आवाहन करतात. काँग्रेसला सोलापूर मतदारसंघातून दुसरा उमेदवार मिळत नसल्याने सुशीलकुमार शिंदे शिवाय पर्याय नाही, असे चित्र निर्माण झाले आहे.

सोलापूर तर हवेच; माढा मतदारसंघावरही पटोलेंचा डोळा

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि राज्य पातळीवरील काही नेते सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला पाहिजे यासाठी सिल्वर ओक आणि बारामतीकडे हेलपाटे मारू लागले आहेत. सोलापुरातील उद्योजक आणि सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय सुधीर खरटमल हे सोलापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहेत. कारण २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणूकमध्ये भाजपने काँग्रेसचा सपाटून पराभव केला. आता आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूरची जागा राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी केली जात आहे.

सोलापुरात झालेल्या काँग्रेसच्या रविवारच्या महामेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर मतदारसंघावर दावा ठोकत माढा मतदारसंघावरही डोळा ठेवला आहे. माढा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी असताना नाना पटोलेंच्या वक्तव्याने आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

Solapur : भाजपचा मोठा मासा काँग्रेसच्या गळाला, पक्षप्रवेश करत नेत्याने आणला अंतर्गत वाद चव्हाट्यावर
काँग्रेसला सोलापूरमध्ये उमेदवार मिळेना

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा २०१४ आणि २०१९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याच्या फरकाने पराभव झाला होता. २०१९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने मतांचं विभाजन झालं होतं. सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या लढाईतून भाजपचे उमेदवार डॉ. जय सिद्धेश्ववर महास्वामी शिवाचार्य यांचा अलगद विजय झाला होता. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेनी अनेकदा भाषणात सोलापूरचे मतदार रक्त आणि भक्तची राजनीती करत आहेत, अशी टीका केली होती.
अभिजीत पाटलांच्या तिकीटाने भालके नाराज, सकाळी पवारांची भेट, दुपारी थेट पटोलेंशी बंद दाराआड चर्चा
गेल्या वर्षी २०२२च्या काँग्रेस स्थापना दिनाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेनी जाहीर पत्रकार परिषद घेत राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली होती. शिंदेनी निवृत्तीची घोषणा केल्यापासून आजतागायत काँग्रेसला २०२४ साठी मजबूत उमेदवार मिळालेला नाही. अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी आगामी लोकसभेसाठी सुशीलकुमार शिंदेच उमेदवार असतील, असे अप्रत्यक्षपणे जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed