जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांमध्ये हा वाद सुरू झाला आहे. प्रा. शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘शिंदे यांच्या मनात काय नाराजी आहे, हे सांगता येणार नाही. त्यांनी पक्षाकडे तक्रार केली असेल तर पक्ष श्रेष्ठी दोघांनाही बोलावून घेतील. तेथे आम्हीही बाजू मांडू. निवडणुकांमध्ये अशी थोडीफार नाराजी होतच असते. नंतर चर्चेतून प्रश्न सुटतात’.
“मोठ्या पक्षांत असे प्रकार होतच असतात. मात्र, महाराष्ट्र या गोष्टीचा साक्षीदार आहे की, गेल्या तीस वर्षांपासून विखे पाटील परिवाराचा पवार कुटुंबियांशी राजकीय संघर्ष सुरू आहे. याबद्दलची विश्लेषणेही इंटरनेटवर उपलब्ध आहेत. माझे आजोबा कै. बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला हा संघर्ष मी लढविलेल्या मागील लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यामुळे विखेंनी पवारांना पाठिंबा दिला, यावर जामखेडमध्ये आणि नगर जिल्ह्यातही कोणी विश्वास ठेवणार नाही”, असंही राम शिंदे म्हणाले.
“काही प्रक्रिया झाल्या असतील, त्यावरून शंका निर्माण होऊ शकते. या शंकेचे निरसन करणे ही आमची जबाबदारी आहे. ती आम्ही आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या नेत्यांसमोर मांडू. मीडियाच्या माध्यमातून त्यावर चर्चा करणे संयुक्तिक नाही. शिंदे यांच्या मनात ही भावना नेमकी कशामुळे निर्माण झाली, हे समजून घेतले जाईल. चर्चेतून तो प्रश्नही सुटेल”, असंही शिंदे म्हणाले.
