• Sat. Jun 13th, 2026
    App-Based Taxi Services: टिप द्या, अन्यथा राइड रद्द! ॲप टॅक्सीचालकांची वाढती मनमानी, अतिरिक्त 100-150 रुपयांची मागणी

    मुंबई : ॲप-आधारित टॅक्सी सेवांमधील चालकांच्या मनमानीमुळे मुंबईतील प्रवासी त्रस्त झाले आहेत. राइड स्वीकारल्यानंतर वाहन अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर आलेले असतानाच चालकांकडून १०० ते १५० रुपयांच्या अतिरिक्त ‘टिप’ची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

    ओला, उबर, रॅपिडोसारख्या ॲप-आधारित सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांकडून अतिरिक्त पैशांच्या मागणीबाबत सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानके, व्यापारी केंद्रे तसेच गर्दीच्या वेळांमध्ये चालक प्रवाशांशी संपर्क साधून ॲपवर दाखवलेल्या भाड्याव्यतिरिक्त रक्कम मागत आहेत. अतिरिक्त पैसे न मिळाल्यास राइड रद्द करून चालक दुसऱ्या प्रवाशाचा शोध घेत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

    Mumbai Crime : AC लोकलमधून तोतया RPF कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास, टीसी साळुंखे-कदम मॅडमना संशय, खडसावताच फेफे उडाली, घडाघडा सत्य सांगितलं
    ॲप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाइक टॅक्सी या वाहतूक सेवांमध्ये पारदर्शकता, शिस्त आणि प्रवासी सुरक्षेसाठी राज्य सरकारने तयार केलेली ‘महाराष्ट्र मोटार वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५’ ही नियमावली अद्याप लागू झालेली नाही. मसुदा नियमावलीवर हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रवासी, चालक आणि विविध संघटनांकडून मोठ्या प्रमाणात सूचना प्राप्त झाल्या आहेत. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या नियमावलीत प्रवासी आणि चालकांच्या हक्कांसह ॲग्रीगेटर कंपन्यांच्या जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र नियमावलीच्या अंमलबजावणीअभावी चालकांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा अद्याप कार्यान्वित झालेली नाही.

    मुलुंड येथील प्रवासी नीलेश कदम म्हणाले, ‘राइड स्वीकारल्यानंतर चालकांनी अटी बदलणे ही प्रवाशांची सरळ फसवणूक आहे. तक्रार करूनही अनेकदा ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.’ अतिरिक्त पैशांची मागणी ही नियमबाह्य असून कंपन्यांनी तक्रार निवारण व्यवस्था अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. राज्यात ॲग्रीगेटर नियमावलीची अंमलबजावणी झाल्यास अशा प्रकारच्या गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे मत प्रवासी संघटनांकडून व्यक्त होत आहे.

    Maharashtra TimesNavneet Rana : पार्थ-सुनेत्रा पवारांना मला राज्यसभेवर पाठवायचं होतं, पण मी अट नाकारली, नवनीत राणांचा खुलासा
    नियमावलीतील महत्त्वाच्या तरतुदी
    -‘सर्ज प्रायसिंग’ (भाडेवाढ) ला कमाल १.५ पट मर्यादा
    -चालकांसाठी १२ तासांची ड्युटी मर्यादा
    -१० तास विश्रांती बंधनकारक
    -३० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य
    -प्रवाशांसाठी विमा संरक्षण
    -मराठीसह तीन भाषांमध्ये अॅप सुविधा
    -लाइव्ह लोकेशन शेअरिंग
    -सुलभ तक्रार निवारण यंत्रणा
    -अॅग्रीगेटर कंपन्यांसाठी परवाना सक्तीचा
    -परवान्याचे नियमित नूतनीकरण अनिवार्य

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed