• Sat. Jun 13th, 2026

    धरणक्षेत्रांमध्ये दाटले चिंतेचे ढग; राज्यात केवळ 25 टक्के उपयुक्त जलसाठा, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

    धरणक्षेत्रांमध्ये दाटले चिंतेचे ढग; राज्यात केवळ 25 टक्के उपयुक्त जलसाठा, कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?

    Maharashtra Dams Water Level: जलसंपदा विभागाने बुधवारी याबाबतचा अहवाल सादर केला. राज्यातील धरणांमध्ये सध्या १०,४२१.९० दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

    महाराष्ट्र धरण पाणीसाठा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुसळधार पावसाची अद्याप प्रतीक्षाच असून उकाड्याने सामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच राज्यातील धरणांमधील पाणीसाठाही तळाला जात असल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण तीन हजार २८ धरणांमध्ये बुधवारपर्यंत केवळ २५.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षी १० जून रोजी हे प्रमाण ३०.५३ टक्के होते.

    विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागात सर्वाधिक म्हणजे ३८.४० टक्के, नागपूर विभागात ३६.९८ टक्के पाणीसाठा आहे. कोकण विभागात ३१.२६ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात २८.१७ टक्के आणि नाशिक विभागात २६.६६ टक्के पाणीसाठा नोंदविला गेला आहे. मात्र, सर्वांत कमी पाणीसाठा पुणे विभागात असून तो केवळ १५.५४ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत शेती आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाणी नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे. हवामान विभागाने राज्यात मान्सून आगमनासाठी पोषक परिस्थिती असल्याचे संकेत दिले असले, तरी पावसाची नियमित सुरुवात होईपर्यंत जलसाठ्यांवरील ताण कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Maharashtra TimesApp-Based Taxi Services: टिप द्या, अन्यथा राइड रद्द! ॲप टॅक्सीचालकांची वाढती मनमानी, अतिरिक्त 100-150 रुपयांची मागणी
    पुण्याची परिस्थिती चिंताजनक

    राज्यात सर्वांत मोठा जलसाठा असलेल्या पुणे विभागातील ७२४ धरणांमध्ये २,३७०.२७ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २६.८२ टक्के होता. म्हणजेच यंदा सुमारे ११ टक्क्यांची घसरण झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, भाटघर, नीरा देवघर, डिंभे, मुळशी, कोयना आणि वारणा यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांतील साठाही अपेक्षेपेक्षा कमी आहे. पावसाला आणखी विलंब झाल्यास पुणे विभागातील शहरे आणि ग्रामीण भाग यांना पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक काटेकोर करावे लागेल, असा अंदाज आहे.
    Maharashtra TimesSharad Pawar: नेहरु अन् मोदींची तुलना होऊ शकत नाही; वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांची जोरदार टोलेबाजी
    मुंबईसाठी अवघा १२ टक्के पाणीसाठा
    मुंबई : मुंबईला अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांतून पाणीसाठा – होतो. सध्या या धरणांत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठ्यापैकी केवळ १ लाख ८० हजार ७५६ दशलक्ष लिटर म्हणजेच १२.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत दहा टक्के आणि सन २०२४मध्ये सहा टक्के पाणीसाठा होता. आता सात धरणांपैकी अप्पर वैतरणा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर आला आहे. मात्र या धरणात राखीव पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणासह भातसा धरणातूनही राखीव पाणीसाठा देण्याचा निर्णय राज्य सरकारने आधीच घेतला आहे.
    Maharashtra TimesMumbai Crime : AC लोकलमधून तोतया RPF कर्मचाऱ्याचा फुकट प्रवास, टीसी साळुंखे-कदम मॅडमना संशय, खडसावताच फेफे उडाली, घडाघडा सत्य सांगितलं
    राज्यातील पाणीसाठ्याची टक्केवारी
    १३८ मोठे प्रकल्प- २४.६२
    मध्यम प्रकल्प- ३१.५४
    लघु प्रकल्प- २४.१७
    ३,०२८- धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घट
    ३१.२६%- कोकण विभागात शिल्लक पाणी
    पुण्यातील परिस्थिती चिंताजनक

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा