• Thu. Jun 11th, 2026

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा हंटर! एकाच वेळी ७ जिल्ह्यांमध्ये छापेमारी; कोट्यवधींचे भेसळयुक्त तूप, खाद्यतेल, पनीर जप्त, कुठे-कुठे कारवाई?

    Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचा हंटर! एकाच वेळी ७ जिल्ह्यांमध्ये छापेमारी; कोट्यवधींचे भेसळयुक्त तूप, खाद्यतेल, पनीर जप्त, कुठे-कुठे कारवाई?

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यापासून राज्यात भेसळ माफिया आणि गुटखा तस्करांचे धाबे दणाणले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील ७ जिल्ह्यांमध्ये एफडीएने एकाच वेळी धडक मोहीम राबवत भेसळ माफियांना मोठा दणका दिला आहे. १ जून ते ९ जून २०२६ या अवघ्या ९ दिवसांच्या कालावधीत विभागात तब्बल २७ ठिकाणी धाडी टाकून २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपयांचा प्रतिबंधित आणि संशयित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

    या धडक कारवाईत ९ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून ६ मोठ्या आस्थापना प्रशासनाकडून सील करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी दिली आहे. एफडीएच्या पथकांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या ७ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी ही छापेमारी केली.

    ९ एफआयआर; गुंडांच्या गाड्याही केल्या जप्त….

    या मोहिमेत एफडीएने केवळ माल जप्त केला नाही तर कायदेशीर बडगाही उगारला आहे. ९ दिवसांत झालेल्या या कारवाईची आकडेवारी पुढीलप्रमाणे:
    एकूण छापेमारी: २७ ठिकाणी धाडी
    जप्त माल: २ कोटी ४७ लाख ७५ हजार रुपये
    गुन्हे (FIR) दाखल: ९ गुन्हे नोंदवले
    अटक आरोपी: ९ जणांना बेड्या
    सील केलेल्या आस्थापना: ६ दुकाने/गोडाऊन सील
    जप्त वाहने: ८ वाहने (किंमत सुमारे ७५ लाख ५० हजार रुपये) गुटखा वाहतूक करताना जप्त.

    भेसळ माफियांचे रॅकेट उद्ध्वस्त; मोहीम सुरूच राहणार

    सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि प्रतिबंधित पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. सहाय्यक आयुक्त श्रीकांत करकरले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम इथेच थांबणार नसून आगामी काळात संपूर्ण मराठवाड्यात अधिक तीव्र केली जाणार आहे. या कारवाईमुळे विभागातील मोठ्या अन्न भेसळ करणाऱ्या रॅकेटचे कंबरडे मोडले आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed