• Sat. Mar 14th, 2026
    Raj Thackeray : राज ठाकरेंनी भाकरी फिरवली, मनसेत हादरे, अनेकांना धक्के

    उल्हासनगर, ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी अंबरनाथ येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगरमधील कार्यकर्त्यांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी बदलापूर आणि उल्हासनगर शहर कार्यकारिणीच बरखास्त केली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाकरी फिरवली, अशी चर्चा रंगू लागली आहे.दरम्यान, राज ठाकरे यांनी तडकाफडकी निर्णय घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे. तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, ही कार्यकारणी बरखास्त केल्याने कल्याण – डोंबिवलीमधील पदाधिकाऱ्यांचे धाबे दाणाणले आहेत.

    बदलापूरची शहर कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर राज ठाकरे यांनी आमदार राजू पाटील आणि जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पुढील १० दिवसांत नवीन कार्यकारिणी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीत कुणाचा समावेश असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, बदलापूर कार्यकारिणी बरखास्त झाल्याने अनेक पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

    कर्नाटक निकालावर राज ठाकरे बोलता-बोलता बरंच बोलले; भाजपला झोडपत राहुल गांधींबद्दल म्हणाले…
    उल्हानसगरची कार्यकारिणीही बरखास्त….

    बदलापूरनंतर उल्हासनगर मनसेची कार्यकारिणी सुद्धा राज ठाकरेंकडून बरखास्त करण्यात आली आहे. आपापसातील हेवेदावे, गटबाजी यामुळे कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरेंकडून ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच यापुढे पक्षात कोणतीही गटबाजी खपवून घेणार नाही, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ठणकावले आहे. पक्षाचे निष्ठेने काम करा. तुमच्या कामाची कदर होणारच. जनतेचे प्रश्न समजून घ्या, ते सोडवा. आपआपसातील हेवेदाव्यात अडकून बसू नका, असेही राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बजावल्याचे सांगितले जात आहे.

    Thene News : एक हजार कोटींच्या मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य; पहिल्या ४० दिवसांतच १०० कोटींची करवसुली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed