अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार जरी अस्थिर करणारा निर्णय दिलेला नसला तरी राज्यपालांची कृती आणि अध्यक्षांचाच्या वर्तनावरुन सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलंय. तत्कालिन राज्यपालांना तर राज्यपालपदाची जाणीव करुन देताना राजकारणात मध्ये पडू नये, असा सल्लाही दिला. तर गोगावले आणि शिंदे अनुक्रमे व्हीप आणि गटनेते बेकायदेशीर असल्याचे सांगत शिंदे गटाला दणका दिला. असं सगळं असूनही न्यायालयाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला, ज्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होणार नाही. न्यायालयाचा निकाल जरी आपल्या बाजूने लागलेला नसला तरी न्यायालयाने सत्ताधाऱ्यांना सुनावेलले खडे बोल याचं आता उद्धव ठाकरे भांडवल करतील आणि त्याच माध्यमातून लोकांच्या मनात सत्ताधाऱ्यांबद्दल परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करतील. हाच निकालाचा अर्थ समजावून घेऊन उद्धव ठाकरे उद्याच लोकांमध्ये मिसळणार आहेत, त्यासाठी त्यांनी जिल्हा निवडलाय- अहदमनगर…!माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १२ मे (शुक्रवारी) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे आणि शनिशिंगणापूरमध्ये शनीचे दर्शन ते घेणार आहेत. यासोबतच पडत्या काळात साथ दिलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची ते भेट घेणार आहेत. गडाख यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त सोनईत आयोजित केलेल्या कार्यक्रमास ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
Supreme Court Verdict Maharashtra Crisis: उद्धव ठाकरेंचा राजीनामा महागात पडला, शिंदे सरकार वाचलं
कोर्टाच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे नगरमध्ये
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालनंतर ठाकरे यांचा हा पहिलाच दौरा आहे. उद्या सकाळी ठाकरे विमानाने शिर्डीला येणार आहेत. तेथून ते सोनईला जाणार आहेत. तेथे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांची भेट घेणार आहेत. गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह शिवसेनेचे निवडक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ठाकरे शनिशिंगणापूर येथे जाऊन शनीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुन्हा शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन ते मुंबईला परतणार आहेत.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर…. सर्वोच्च न्यायालयाने निकालात काय काय म्हटलं?
पाठीराख्याच्या वाढदिवसाला ठाकरे नगरमध्ये!
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी सर्वप्रथम शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना जलसंधारण मंत्रीपद मिळाले होते. पुढे शिवसेना फुटीच्यावेळीही गडाख ठाकरे यांच्यासोबत ठामपणे राहिले. मधल्या काळात ठाकरे यांच्यासमोरही अनेक अडचणी आल्या. मात्र, त्याही काळात ते ठाकरे यांच्यासोबतच राहिले. त्यामुळे गडाख आणि ठाकरे यांच्या भेटीला महत्व आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वागताची जोरदार तयारी केली आहे.
विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा, कोर्टाने अध्यक्षांना सुनावलं