• Thu. Mar 12th, 2026
    ३ दिवस गावाकडे राहून शिंदेंच्या ६५ फाईलवर सह्या, तेवढ्या फाईल मी ३ तासात निपटवतो: अजितदादा

    सातारा : राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. असं असताना महागाईचा जटील मुद्दा आहे. इकडे कोकणात रिफायनरीचा मुद्दा आहे. हा सोडवायचा सोडून आपले मुख्यमंत्री कर्नाटकात प्रचाराला गेलेत. त्यांना कोण ओळखतं कर्नाटकात? राज्यात कोण ओळखत नाही, कर्नाटक राज्यात कोण ओळखणार त्यांना… अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.कोरेगाव येथे बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार व रामराजेच्या आभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील, सुनील माने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    अजित पवारांच्या घराशेजारी तरुणीचा विनयभंग, दादांचा टुकार कारट्यांना बारामतीत इशारा, माझ्या पद्धतीने…
    शिंदे-फडणवीस सरकारवर अजितदादांचं टीकास्त्र

    सध्याचे हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून बदल्यांसाठी रेट ठरला आहे, असा गंभीर आरोप अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला. सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली असून एका कार्यकर्त्याने मला दाखविलेला फोटो पाहून धक्काच बसला. मनगट तोडण्याचे काम जर कोण करीत असेल तर सरकार काय झोपा काढतंय का? असा प्रश्न त्यांनी केला.

    शिंदे सरकारची इमेज कशी? सावंतवाडीच्या शाळेतली पोरं म्हणाली, आ गऐ गद्दार… पवारांनी सांगितला किस्सा
    मुख्यमंत्री शिंदेंवर आसूड

    मुख्यमंत्री गावाकडे शेती करतात असं सांगतात. झाडे तीच दाखवतात, असं सांगत अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची मिमिक्री केली. तीन दिवस गावी राहून ६५ फाईल्सचा निपटारा केला असं सांगतात, मात्र तीन हजार फाईल्स पेंडींग आहे, त्या बघा… असा सल्ला देताना मी एवढ्या फाईल्स ३ तासात निपटवतो, असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला.

    अपयश आलेल्यांनी खचू नका, विजय मिळालेल्यांनी मातू नका

    बाजार समितीच्या निवडणुकीत आपण सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी कमी पडलो. पण, अपयशाने खचून जायचं नाही आणि यशाचा उन्माद करायचा नाही. या निवडणुकीत १४७ पैकी ८० ठिकाणी महाविकास आघाडीच्या स्थानिक पॅनेलची सत्ता आली, तर भाजप व सत्ताधाऱ्यांना ४७ ठिकाणी तर ३८ ठिकाणी सर्वपक्षिय आघाड्या निवडून आल्या आहेत. या निकालातून आताच्या राज्यकर्त्यांना जनतेने नाकारल्याचे स्पष्ट आहे, अशी टीका केली.

    फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन, शरद पवार म्हणाले, कोर्टाचा निकाल काय….
    हा यशवंतरावांचाच सातारा जिल्हा आहे का…?

    कोरेगावामध्ये पोलिस निरीक्षक पोस्ट असून ही कोणी चार्ज घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. मी आणि वळेस पाटील यांनी साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून काम केलं आहे. पण, तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. राज्यात व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली व त्यांच्यानंतर पवार साहेब यांनी हे काम केले. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे म्हटले जाते. त्यांच्या जिल्ह्यात काय चालले आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed