• Sat. Mar 7th, 2026
    छ. संभाजीनगरमध्ये ट्रॅक्टर आडवे लावले, समृद्धी महामार्ग रोखला, पोलिसांची धावपळ, अखेर …

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्या वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस आहे. या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. समृद्धी महामार्गावर साचलेलं पाणी पन्हाळाने शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे शेतात तीन फूट पाणी साचलं. परिणामी शेतकऱ्याच्या तब्बल ५०० क्विंटल कांद्याचं नुकसान झालं. कांद्याला भाव मिळत नाही असं असताना आता हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात भिजल्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टर समृद्धी महामार्गावर आडवे लावत राग व्यक्त केला.

    पंतप्रधानांकडून लोकार्पणानंतर २४ तासांच्या आतच समोर आल्या समृद्धी महामार्गावरील अडचणी

    वैजापूर तालुक्यातील जांबरगाव शिवारात ही घटना घडली. वैजापूर तालुक्यातील जांबरगाव टोल नाका जवळ असलेल्या गट नंबर ३१ मधील शेतकरी सुनील भोसले जनार्दन भोसले, पोपट भोसले, दीपक भोसले आणि गट नंबर ५० मधील देविदास साठे, राजेंद्र साठे यांच्या शेतात हे पाणी शिरलं होतं. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शेतातील फळभाज्या, धान्याचं नुकसान होत आहे.

    खरेदीसाठी गेले, घरी येताना टेम्पोची बाईकला धडक; सिल्लोडमधील सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला यामुळे जिल्ह्यातील फळबागा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. यामुळे शेतकरी संकटात आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि हे पाणी पन्हाळ्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलं. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात तब्बल तीन फूट पाणी साचलं.

    दुपारी दुकानात आला, ज्युसमधून विषारी औषध घेतलं; स्वत:च्याच मेडिकलमध्ये उच्चशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं
    एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या कांद्याचं होत्याचं नव्हतं झालं. तब्बल पाचशे टन कांदा अवकाळी पावसामुळे पाण्यात भिजला. अगोदरच शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नसताना शेतकरी संकटात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत.

    पाण्याने भिजून झालेल्या नुकसानामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर ट्रॅक्टर आडवे लावून याचा निषेध केला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्याची समजूत काढत यापुढे शेतात पाणी शिरणार नाही असं आश्वासन दिल्यामुळे ट्रॅक्टर बाजूला घेण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed