• Fri. Jun 26th, 2026

    राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग देशात अग्रस्थानी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

    ByMH LIVE NEWS

    May 1, 2023
    राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग देशात अग्रस्थानी – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

    पालघर दि. 01 : देशातील विविध राज्यातील बांधकाम विभागांपेक्षा महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग कामामध्ये अग्रस्थानी असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

    बांधकाम भवन या नूतन इमारतीच्या तसेच रेल्वे फाटक क्र. 47 अ कोळगांव येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खाजदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भूसारा राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    रेल्वेचे जाळे देशात मोठ्या प्रमाणात पसरले असून रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी रेल्वे फाटक बसविण्यात आले आहे. इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येतात. कोळगांवातील उड्डाण पुलामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. देशामध्ये दिवसाच्या 36 कि. मी. चा रस्ता तयार होतो. नवीन रस्ते निर्माण करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असते. स्थानिकांना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे. विकासाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही. नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प येत्या काळात पूर्ण करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed