याचदरम्यान कंपनीच्या बॉयलर विभागात बॉयलरमधील आग ओकणारा वायू व तप्त कोळसा तेथील कामगारांच्या अंगावर उडाला. या दुर्घटनेत काम करत असलेले विवेक मिश्रा (४८) यांच्यासह अन्य सहा कामगार होरपळले. इतर कामगारांनी जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. जवळपास २० ते ३० टक्के भाजले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नवीमुंबईच्या ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात अपघात होऊ नये यासाठी पुरेशी काळजी न घेतल्याने, तसेच कंपनी प्रशासनाकडून केलेल्या निष्काळजपणामुळे सदरची घटना घडल्याचा ठपका ठेवत जय इंडस्ट्रीज कंपनी प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.