• Sat. Sep 21st, 2024

भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवू नका, अंनिसनं शेतकऱ्यांना आवाहन का केलं?

भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवू नका, अंनिसनं शेतकऱ्यांना आवाहन का केलं?

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या घट मांडणीतील भाकिताची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. भेंडवळच्या घट मांडणीचे अंदाज देखील जाहीर झाले आहेत. आता भेंडवळच्या घट मांडणीतून केल्या जाणाऱ्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. अंनिसचे संघटक रघुनाथ कौलकर यांनी भेंडवळच्या घट मांडणीतून केल्या जाणाऱ्या बाकितांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवू नका, त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, असं रघुनाथ कौलकार म्हणाले आहेत. रघुनाथ कौलकरार एबीपी माझा या वाहिनीसोबत बोलत होते.

भेंडवळच्या घट मांडणीला शास्त्रीय आधार नाही, अंनिसची भूमिका

अंनिसचे संघटक रघुनाथ कौलकार यांनी भेंडवळच्या घट मांडणीतील अंदाज हे कोणत्याही शास्त्री आधाराशिवाय काढलेले आहेत. भेंडवळची घट मांडणी म्हणजे निव्वळ पोपटपंची म्हणून ही भाकित सांगितली जातात. शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये. अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या २५ वर्षांपासून याचा अभ्यास करत आहे. कितीतरी भाकित चुकीची ठरतात, लॉ ऑफ प्रॉबिलिटी नुसार काही भाकित खरी ठरतात त्याचा उदो उदो केला जातो. राज्यातील शेतकऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये, असं आवाहन रघुनाथ कौलकार यांनी केली आहे.

पेट्रोल पंपवर बसच्या टाकीत स्फोट, बस पेटली; चालक होरपळला, सैरावैरा पळत सुटला अन् मग…

भेंडवळच्या घट मांडणी शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये : रघुनाथ कौलकार

रघुनाथ कौलकार यांनी शेतकऱ्यांना भेंडवळच्या घट मांडणीतून केल्या जाणाऱ्या भाकितांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं. भेंडवळच्या घट मांडणीत पावसासंदर्भात, राजकारणासंदर्भात अंदाज व्यक्त केले जातात. पावसाचा संबंध थेट शेतकऱ्यांशी असल्यानं रघुनाथ कौलकार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे.
पृथ्वी शॉचे ग्रह फिरले, संघातून बाहरे काढल्यावर वॉर्नर म्हणाला की त्याला आता लवकरच…

भेंडवळच्या घट मांडणीच्या अंदाजात काय?

शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेली बुलढाण्यातील ” भेंडवळच्या घट मांडणी ” चे अंदाज काल जाहीर करण्यात आले आहे. घट मांडणी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पार पडलेली होती. जूनमध्ये कमी पाऊस असेल, जुलैमध्ये सर्वसाधारण पाऊस असेल आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस आणि अतिवृष्टी होईल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस पडून पिकांचं नुकसान होऊ शकतं, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लग्न आटोपून घरी जाताना झाडाखाली थांबले,वीज कोसळली अन् दोन चिमुकल्यासंह आई वडिलांचा मृत्यू ,अख्खं कुटुंब संपलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed