• Sat. Mar 14th, 2026

    आजींचा २१ वर्ष पुणे महापालिकेसोबत संघर्ष, अखेर वसंत मोरेंना भेटल्या, १० लाखांचा चेक हाती

    आजींचा २१ वर्ष पुणे महापालिकेसोबत संघर्ष, अखेर वसंत मोरेंना भेटल्या, १० लाखांचा चेक हाती

    पुणे :मनसेचे नेते वसंत मोरे हे नेहमी वेगवेगळ्या कारणानी चांगलेच चर्चेत असतात. तसेच समाजाच्या हितासाठी अनेकदा फेसबुक लाईव्ह करत ते त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. आपण अनेकदा म्हणतो की, सोशल मीडिया ही फक्त तरुणाईची क्रेझ आहे. मात्र, एका ७३ वर्षीय आजीने या सोशल मीडियावरून वसंत मोरे यांचे व्हिडिओ पाहिले आणि थेट मदतीसाठी त्यांनी त्यांच्याकडे धाव घेतली. वसंत मोरे यांनी देखील त्यांच्या प्रश्नाला न्याय देत त्यांना २००३ ते २०१३ पर्यंतचा फरक मिळवून दिला. उरलेल्या दिवसांचा फरक देखील त्यांना मनपाकडून देण्यात येणार असल्याचे वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह करून सांगितली. त्यामुळे आजींच्या २१ वर्षांच्या संघर्षाला यश आले आहे. वसंत मोरे यांनी आजींकडे १० लाख ३७ हजार ६६६ रुपयांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला.

    पुण्यातील राठोड आजी या संगमवाडी येथे राहतात. त्यांचे पती अरविंद राठोड यांनी सुमारे चाळीस वर्ष मनापामध्ये नोकरी केली. मात्र ते निवृत्त झाल्यानंतर म्हणजे २००२ ते २०१३ मध्ये सुद्धा त्यांना त्यांच्या हककाच्या पेन्शनसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. त्यानंतर त्यांचे निधन झाले. तरी देखील मनपाकडून त्यांना पेन्शन देण्यात आली नव्हती. त्यानंतर २०१३ ते २०२३ पर्यंत अरविंद राठोड यांच्या पत्नी पुष्पा राठोड यांना देखील दहा वर्ष पेन्शनसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागले.

    शेतकरी आत्महत्या ते महागाई, राज्यासह केंद्र सरकारवर हल्लाबोल करत चॅलेंज, उद्धव ठाकरेंच्या सभेतील प्रमुख मुद्दे

    एवढे करूनही पेन्शन त्यांना मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर मनसे नेते वसंत मोरे यांचा व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी थेट त्यांची भेट घेत घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली. वसंत मोरे यांनी याची दखल घेत मनपाच्या संबधित अधिकाऱ्यांची स्वतः भेट घेत सर्व प्रकार सांगत त्यांची कान उघडणी देखील केली.

    लग्न आटोपलं, वऱ्हाड निघालं, वाटेतच बसचा टायर फुटला, चालकाचं नियंत्रण सुटलं अन्…

    त्यानंतर अधिकाऱ्यांनी देखील तातडीने त्याची दखल घेत राठोड आजींना २००२ ते २०१३ पर्यंतचा फरक असलेला १० लाख ३७ हजार ६६६ रुपयांचा धनादेश दिला आहे. तर उरलेल्या दहा वर्षांची पेन्शनचा धनादेश देखील लवकर मनपाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे सुरुवातीला पती सोबत आणि पती गेल्यानंतर म्हणाजे २१ वर्ष करत असलेल्या संघर्षला यश आले आहे.

    छत्रपती राजाराम कारखान्याच्या मतदारांचा कौल मतपेटीत बंद? पाटील की महाडिक, कोण बाजी मारणार, उत्सुकता शिगेला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed