• Sat. Sep 21st, 2024

सतत दारूच्या नशेत, चार महिन्यांपूर्वी बायको सोडून गेली; २५ वर्षांच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

सतत दारूच्या नशेत, चार महिन्यांपूर्वी बायको सोडून गेली; २५ वर्षांच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर:करमाड परिसरातील गोलटगाव येथील पंचवीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार दि. २३ रोजी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. दरम्यान तरुणाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकले नाही.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल संजय गुंजाळ वय २५ रा. वडर वाडी गोलटगाव ता. जि. छत्रपती संभाजीनगर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अनिल हा कुटुंबीयांसोबत बोलते गाव परिसरामध्ये राहत होता त्याचा विवाह झालेला असून त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. पूर्वी तो मजुरी काम करायचा मात्र गेल्या काही दिवसांपासून अनिल हा दारूच्या आहारी गेला होता.

पाऊस सुरू झाला म्हणून शेतातून निघाले, वाटेतच शेतकऱ्यावर वीज कोसळली, पावसाने घेतले दोन बळी
अनिल सतत दारू पिऊन पत्नीलाही त्रास देत असायचा. त्यामुळं त्याच्या रोजच्या त्रासाला वैतागून चार महिन्यांपासून पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली होती. दरम्यान शनिवार दिनांक २२ रोजी दिवसभर बाहेर फिरून रात्री घरी झोपण्यासाठी आला. पहाटे पाच वाजेच्या सुमारास अनिलने घराच्या पत्र्याच्या खोलीत लोखंडी अँगलच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी बातमी, मुंबईला जाणाऱ्यांना दादरलाच उतरावं लागणार, कारण…
ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ त्याला घाटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केलं. दरम्यान अनिल याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी करमाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. विक्की जाधव करीत आहे.

अवकाळी पावसाचा फटका, कापूस पिवळा पडत असल्याने चिंतेत वाढ, शेतकरी दुहेरी संकटात

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed