• Mon. Mar 16th, 2026
    जेवून घ्या रे, महाराष्ट्र भूषण सोहळ्यातून आईचा फोन; लेकरं शोधत राहिली, माऊली परतलीच नाही

    नवी मुंबई :अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याला गालबोट लागलं. उष्माघातामुळे १३ श्रीसदस्यांना प्राण गमवावे लागले. खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे खारघर येथील रहिवासी मीनाक्षी मिस्त्री यांना मृत्यूने गाठले.मीनाक्षी मिस्त्रींच्या अकस्मात मृत्यूने मिस्त्री कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘त्या दिवशी आईने सकाळी पाच वाजताच उठून आम्हा सगळ्यांसाठी जेवण बनवलं. भर उन्हात ती कार्यक्रमाला निघून गेली, आम्ही तिला न जाण्याची विनंती करत होतो, मात्र तिने ऐकलं नाही. ती गेली, पण परत आलीच नाही’ अशा शब्दात मीनाक्षी मिस्त्री यांच्या मुलाने शोक व्यक्त केल्याचं वृत्त ‘टीव्ही९ मराठी’ने दिलं आहे.

    भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलतानाच हार्ट अटॅक; बहीण जमिनीवर कोसळली, ती उठलीच नाही…
    आईने सकाळीच सगळ्यांसाठी जेवण बनवलं आणि ती कार्यक्रमासाठी निघाली. तिथे पोहोचल्यावर तिने घरी फोन केला होता. मी जेवण बनवलंय, तुम्ही जेवून घ्या. मी कार्यक्रम झाल्यावर येते, हेच तिचे अखेरचे शब्द ठरले. ही आईची आठवण सांगताना मुलगा प्रितीश मिस्त्रीला हुंदका अनावर झाला.
    गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी नेताना घात, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू
    कार्यक्रम सुटल्यावर आई घरी येईल, असंच सर्वांना वाटत होतं. मात्र कार्यक्रमाची वेळ संपल्यानंतरही ती घरी आली नाही. तिचा फोनही लागत नव्हता. त्यामुळे आम्हाला खूप काळजी लागून राहिली. बराच वेळ शोधाशोध करत होतो, पण काहीच समजत नव्हतं. अखेर संध्याकाळी नको ती बातमी समजली, असं सांगताना प्रितीश भावनावश झाला.

    पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी खारघर येथे आले होते. आपल्या गुरुला सन्मानित होताना याचि देही याची डोळा पाहण्यासाठी तब्बल २० लाख श्री सदस्यांनी उपस्थिती लावल्याचे बोलले जाते.

    नवी गाडी घेतली, कागदपत्र जुळवून परतताना सिमेंट मिक्सरची धडक, तरुणाच्या मृत्यूने गाव हळहळलं
    उष्माघाताचा त्रास सहन न झाल्याने एकूण ११ श्री सदस्यांचा बळी गेला नवी मुंबई पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात उष्माघातामुळे उपचारार्थ दाखल झालेल्या अन्य ४० श्री सदस्यांपैकी चार ते पाच श्री सदस्य अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. त्यामुळे न भूतो न भविष्यती असा ठरू पाहणाऱ्या या कार्यक्रमात मृत्यूने तांडव घातल्याचे दिसून आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed